Friday, April 28, 2017

समाजसुधारक



लोकमान्य टिळकांची कामगिरी (1856-1920) :

  • जन्म : 23 जुलै 1856, चिखली, जि. रत्नागिरी
     
  • 1881 - केसरी (मराठी), मराठा (इंग्रजी) वृत्तपत्रे
     
  • 1880 - न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना
     
  • 1884 - डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना
     
  • 1893 - सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ
     
  • 1895 - शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात, बर्वे प्रकरणात 101 दिवसांची तुरंगवासाची शिक्षा झाली होती.
     
  • 1908 - कोलकत्यातील एका बॉम्ब स्फोटावर लेख लिहल्याबद्दल 'राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा' - मंडाले येथे रवानगी - तेथेच'गीतारहस्य' या ग्रंथाचे लिखान.
     
  • 1914 - मंडालेल्या तुरंगातून सुटका
     
  • 1916 - लखनौ अधिवेशनात मवाळ व जहालांना एकत्र आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न.
     
  • 1920 - काँग्रेस अंतर्गत 'काँग्रेस लोकशाही पक्ष' टिळकांनी स्थापन केला.
     
  • 1920 - 1 ऑगस्ट टिळकांचा मृत्यू. 'भारतीय असंतोषाचे जनक' असे व्हॅलेटाईन चिरोलटिळकांना म्हणत असत.

Thursday, April 27, 2017


महाराष्ट्रातील पहिल्या घटना -

*महाराष्ट्रातील पहिले ग्रामन्यायालय -उरुळीकांचन (पुणे)

*महाराष्ट्रातील पहिली ई-ग्रामपंचायत - हिंगोली

*जिल्हा सेतू सुविधा ऑनलाईन करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा - नाशिक

*महाराष्ट्रातील पहिले वाईल्ड बफेलो (रानम्हैस) अभयारण्य - गडचिरोली

*महाराष्ट्रातील पहिला ई-ऑफीस प्रणाली राबविणारा जिल्हा - सिंधुदुर्ग

*महाराष्ट्रातील पहिली व्हिडीओ कॉन्फरन्स् जोडलेली पहिली जिल्हा परिषद - ठाणे

*महाराष्ट्रातील उसाच्या मळीपासून मद्य निर्मीती करणारा पहिला कारखाना - सांगली

*महाराष्ट्रातील इको-व्हिलेजचा पहिला प्रयोग - बोल्डावाडी (हिंगोली)

*महाराष्ट्रातील पहिले अधिकृत इलेक्ट्रानिक कचरा गोळा करण्याचे केंद्र - अंधेरी

*महाराष्ट्रातील पहिली मासळी वरील रोगनिदानासाठी उभारण्यात आलेली प्रयोगशाळा - पालघर

*महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आदिवासी आश्रमशाळेत क्रिडा प्रबोधनी स्थापन केली -यवतमाळ

*महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव उपचार केंद्र -चंद्रपूर

*महाराष्ट्रातील पहिले सॅटेलाईट सिकलसेल रिसर्च सेन्टर - चंद्रपूर

*महाराष्ट्रातील पहिला ई-विद्या प्रकल्प राबविणारा जिल्हा - गडचिरोली

*महाराष्ट्रातील पहिली मोफत 4 - जी वाय-फाय सुविधा देणारी नगरपालिका - इस्लामपूर (सांगली)

*महाराष्ट्रातील पहिले मोफत वाय-फाय सुविधा देणारे गाव - पाचगाव (नागपूर)

*महाराष्ट्रातील पहिले मोफत वाय-फाय सुविधा देणारे शहर - इस्लामपूर (सांगली)

*महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायतीमध्ये ई-बँक सेवा देणारी ग्रामपंचायत - परसोडी (यवतम

*महाराष्ट्रातील पहिले बांबु विक्रीचा अधिकार मिळणारे गांव - लेखामेंडा (गडचिरोली)

*महाराष्ट्रातील पहिले स्तनपान कक्ष - चंद्रपूर एस.टी. आगार

*महाराष्ट्रातील पहिली ऑनलाईनद्वारे ग्रामसभा उपक्रम राबविणारी पहिली जिल्हा परिषद -चंद्रपूर जिल्हापरिषद

*महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र -@ पुणे

*महाराष्ट्रातील पहिला फॉरेस्ट सायबर सेल  -मेळघाट


सुमारे 10 वर्षांच्या कालखंडानंतर पार पडलेली आंतरराज्यीय परिषद केव्हा व कोठे पार पडली?

12 जुलै, 2016, मुंबई
10 जुलै, 2016, पणजी
16 जुलै, 2016, अहमदाबाद
16 जुलै, 2016, नवी दिल्ली  
उत्तर : 16 जुलै, 2016, नवी दिल्ली

2. संयुक्त राष्ट्राने स्वीकारलेल्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या अंमलबजावणीत भारताचे स्थान कितवे राहिले?

110 वे
112 वे
113 वे
114 वे
उत्तर : 110 वे

3. संयुक्त राष्ट्र संघाने स्वीकारलेली शाश्वत विकास उद्दिष्टे किती आहेत व ती केंव्हापर्यंत साध्य करावयाची आहेत?

15,2030
16,2025
17,2030
20,2040
उत्तर : 17,2030

4. 28 सदस्य असलेल्या NATO चे 27 वे शिखर संमेलन जुलै, 2016 मध्ये कोठे पार पडले?

इटली (रोम)
न्यूयॉर्क (अमेरिका)
पॅरिस (फ्रान्स)
वारसॉ (पोलंड)
उत्तर : वारसॉ (पोलंड)

5. खालीलपैकी पूर्णपणे अनारक्षित यात्रेकरूंसाठी धावणारी रेल्वे कोणती?

हमसफर
तेजस
अंत्योदय
उदय
उत्तर : अंत्योदय

6. संपूर्ण रेल्वे 3AC चे डब्बे असणारी रेल्वे कोणती?

हमसफर
तेजस
अंत्योदय
उदय
उत्तर : हमसफर

7. डबल डेकर व पूर्णपणे वातानुकूलित गाडी कोणती?

हमसफर
तेजस
अंत्योदय
उदय
उत्तर : उदय

8. इनायम हे नवीन स्थापित बंदर कोणत्या राज्यातील आहे?

प.बंगाल
केरळ
तामीळनाडू
गोवा
उत्तर : तामीळनाडू

9. RBI चे नवनियुक्त डेप्युटी गव्हर्नर कोण?

उर्जित पटेल
उषा थोरात
एन. एस. विश्वनाथन
अरुधंती भट्टाचार्य
उत्तर : एन. एस. विश्वनाथन

10. योग्य जोड्या जुळवा.
खेळाडू - खेळ
अ. डोला बॅनर्जी       1. बॅडमिंटन
ब. अपर्णा पोपट      2. स्नूकर
क. अणूजा ठाकूर    3. बुद्धिबळ
ड. परिमार्जन नेगी   4. नेमबाजी

अ-1, ब-2, क-3, ड-4
अ-3, ब-4, क-1, ड-2
अ-4, ब-1, क-2, ड-3
अ-2, ब-1, क-3, ड-4
उत्तर : अ-4, ब-1, क-2, ड-3


मित्रानो काल जी PSI-STI-ASO ऍड आली आहे त्याची संपूर्ण प्रोसेस कशी असेल याबाबत संपूर्ण माहिती👇


मित्रानो काल जी PSI-STI-ASO ऍड आली आहे त्याची संपूर्ण प्रोसेस कशी असेल याबाबत संपूर्ण माहिती फोटो फॉर्मेट मध्ये दिलेली आहे वाचून घ्या.












Wednesday, April 26, 2017

दिनविशेष वाचा आजचा इतिहास

दिनविशेष :

  • 27 एप्रिल 1878 मध्ये कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजूरी दिली.
     
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म 27एप्रिल 1909 मध्ये झाला.

  • आमीर खानला सरसंघचालकांच्या हस्ते पुरस्कार प्रदान :

  • मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असलेला अभिनेता आमीर खानने तब्बल 16 वर्षानंतर पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.
     
  • 'दंगल' चित्रपटातील उत्कृष्ट भुमिकेसाठी आमीरला भागवत यांच्या हस्ते दिनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. लता मंगेशकर यांच्या खास आग्रहास्तव आमीर या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिला होता.
     
  • मुंबईमध्ये दिनानाथ मंगेशकर यांच्या 75व्या पुण्यतिथी निमित्त या पुरस्कार वितरणसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
     
  • तसेच या पुरस्कार सोहळ्यात आमीर खानच्या'दंगल' चित्रपटातील भुमिकेसाठी विशेष पुरस्कार देउन त्याला गौरविण्यात आले.
     
  • आमीर याआधी 16 वर्षापुर्वी 'लगान' चित्रपटाससर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला, त्यावेळी पुरस्कार सोहळ्यास उपस्थित होता.
     
  • या पुरस्कार सोहळ्यादरम्यान माजी क्रिकेटपटूकपिल देव तसेच प्रख्यात अभिनेत्रीवैजयंतीमाला यांनाही पुरस्कार देउन गौरविण्यात आले.

राजीव भटनागर सीआरपीएफचे नवे महासंचालक :

  • केंद्र सरकारने केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) महासंचालकपदी राजीव राय भटनागर यांची नियुक्ती केली आहे. भटनागर हे1983 च्या तुकडीचे उत्तर प्रदेश केडरचे'आयपीएस' अधिकारी आहेत.
     
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या निवड समितीने भटनागर यांच्या नियुक्तीला मंजुरी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
     
  • छत्तीसगड येथे नुकत्याच झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर झालेल्या टीकेच्या पार्श्‍वभूमीवर'सीआरपीएफ'च्या महासंचालकांची रिक्त जागा आता भरण्यात आली आहे. सध्या सुदीप लखताकिया यांच्याकडे 'सीआरपीएफ'चा प्रभारी कारभार होता.
     
  • दरम्यान, इंडो तिबेट सीमा पोलिस दलाच्या(आयटीबीपीमहासंचालकपदी आर.के. पचंदा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
     
  • तसेच सध्या 1983 च्या तुकडीचे 'आयपीएस'अधिकारी असलेले पचंदा हे पश्‍चिम बंगाल केडरचे अधिकारी आहेत.

सुशीलकुमार शिंदे यांना पहिली डी.लिट. पदवी प्रदान :

  • 'आपल्या देशात वर्तमानपत्र विकणारा राष्ट्रपती होतो, न्यायालयात शिपाई म्हणून काम केलेली व्यक्ती देशाचा गृहमंत्री होतो हे प्रगल्भ लोकशाहीची लक्षणे आहेत. त्याचेच प्रतीक असलेले सुशीलकुमार शिंदे यांनी शून्यातून विश्‍व निर्माण केले आहे', असे गौरवोद्‌गारराज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी काढले.
     
  • सोलापूर विद्यापीठाच्या वतीने आयोजित केलेल्या विशेष दीक्षान्त समारंभातसुशीलकुमार शिंदे यांना राव यांच्या हस्तेपहिली डी.लिट. पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.
     
  • तसेच ते डिजिटल पद्धतीने तयार करण्यात आले आहे. राज्यात अशी पदवी प्रथमच दिली जात असल्याचा उल्लेख कुलगुरू डॉ. एन.एन. मालदार यांनी केला.

पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर :

  • पोलीस दलामध्ये राष्ट्रपती शौर्यपदक, पोलीस पदकानंतर महत्त्वाचे समजल्या जाणारे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह (इनसिग्निया) 687 अधिकारी-कर्मचाऱ्यांना जाहीरकरण्यात आले आहे.
     
  • पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी विजेत्यांची नावे जाहीर केली. एक मे रोजी या पदकांचे वितरण केले जाणार आहे.
     
  • सन्मानचिन्ह विजेत्यामध्ये राज्य गुप्त वार्ता विभागाचे विशेष महानिरीक्षक संतोष रस्तोगी, मुंबईतील अप्पर आयुक्त आस्वती दोरजे, ठाण्यातील अप्पर आयुक्त यशस्वी यादव, साताऱ्याचे पोलीस प्रमुख संदीप पाटील, कोल्हापूरचे अप्पर अधीक्षक सोहेल शर्मा आदींचा समावेश आहे.
     
  • पोलीस दलात उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण सेवा बजाविणाऱ्यांना दरवर्षी एक मे रोजी महासंचालक सन्मानचिन्हाने गौरविण्यात येते.
     
  • 2016 या वर्षासाठी जाहीर केलेल्या 687 जणांमध्ये 16 अधिकारी-अंमलदार हे राष्ट्रपती शौर्यपदक, पोलीस पदकाने सन्मानित आहेत. त्यामुळे त्यांनाही स्वतंत्रपणे'इनसिग्नीया' बहाल करण्यात आला आहे.

माहितीच्या अधिकाराविषयी महत्वाचे मुद्दे

माहितीच्या अधिकाराविषयी महत्वाचे मुद्दे :

  1. जम्मू-काश्मीर वगळून महितीचा अधिकार कायदा देशातील सर्व राज्यांना लागू करण्यात आला आहे.
     
  2. माहिती आयोग देखरेख व नियंत्रणास जबाबदार आहे.
     
  3. समुच्चीत शासन व सार्वजनिक प्राधिकार हे अमलबजावणीसाठी जबाबदार आहेत.
     
  4. एकूणच शासनाची आंतरराष्ट्रीय धोरणे, न्यायालयांचे निर्णय व नागरी संघटनांचा वाढता दबाव त्यांच्यामुळे माहितीच्या कायद्याच्या निर्मितीला चालना मिळाली.
     
  5. 1990 नंतर भारतात माहितीचा अधिकार कायदा लागू केला होता.
     
  6. 1990 पर्यंत जगातील 13 राष्ट्रांनी माहितीचा अधिकार कायदा लागू केला होता.
     
  7. माहितीचा अधिकार कायदा स्वीकारण्यामध्ये जगातील पहिला देश स्वीडन हा ठरला आहे.
     
  8. इ.स.1766 मध्ये फ्रिडम ऑफ प्रेस अक्ट असा कायदा करून स्वीडने महितीचा अधिकार सर्वप्रथम मान्य केला.
     
  9. यूनोच्या अमसभेच्या पहिल्या अधिवेशनात 1946 साली युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्यूमन राईटस मध्ये संमत केलेल्या ठरावास असे असेस्पष्ट करण्यात आले होते की, नागरिकांना माहिती मिळविण्याचे स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार असून तो संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेल्या नागरिकांना आधारशील आहे.
     
  10. स्वीडननंतर डेन्मार्क, फीनलँड व नॉर्वे या देशांनी माहितीच्या अधिकारचे कायदे केले.
     
  11. 20 व्या शतकाच्या उतरार्धात यूरोपियन युनियनने पारदर्शकतेसाठी महितीचा अधिकार अनिवार्य मानला.
     
  12. यूरोपियन कन्हेशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ हुमण राईट्स अँड फंडामेंटल फ्रीडम 1950 मध्ये जाहीर करण्यात आला.
     
  13. इ.स. 1966 साली अमेरिकेत फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन अॅक्ट स्वीकारण्यात आला.
     
  14. 1966 मध्ये ब्रिटनने महितीचा अधिकार स्वीकारला.
     
  15. इ.स.1971 मध्ये राष्ट्रकुल संघटनेने किंवा मंडळाने नागरिकांचा प्रशासनातील सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने माहितीच्या अधिकाराचा स्वीकार केला.
     
  16. इ.स. 1982 च्या दरम्यान कॅनडा, फ्रान्स व ऑस्ट्रेलिया या राष्ट्रकुलातील देशांनी माहितीच्या अधिकाराचा पुरस्कार केला.
     
  17. इ.स.1999 मध्ये डर्बन येथे झालेल्या परिषदेत राष्ट्रकुल संघटनेने माहितीच्या अधिकाराला स्वातंत्र्य न्यायिक अधिकाराच्या रूपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
     
  18. 28 डिसेंबर, 2005 रोजी चीनने द फ्रीडम ऑफ गव्हर्नमेंट इन्फॉर्मेशन ऑफ लॉ असा कायदा लागू केला.
     
  19. 16 डिसेंबर, 1966 रोजी नागरी आणि राजकीय हक्कांच्या आंतरराष्ट्रीय करार नाम्यानुसार माहिती मागण्याचे आणि माहिती मिळविण्याचे आणि ती इतरांना देण्याचे स्वातंत्र्य समावलेले आहे,
     
  20. इ.स.1978 मध्ये यूनेस्कोने एक घोषणापत्र जाहीर केले त्यानुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि महितीचा अधिकार यांचा मूलभूत मानवाधिकार व मूलभूत स्वातंत्र्याचा अधिकार यांचा अविभाज्य भाग मानण्यात आले.
     
  21. जगातील पर्यावरण चळवळीला व महितीच्या अधिकाराचा चांगला संबंध आले.
     
  22. इ.स.1992 मध्ये ब्राझील येथील रिओ दी-जानेरो येथे भरलेल्या वसुंधरा परिषदेमध्ये हे मान्य करण्यात आले की आपल्या परिसरात होणारे प्रदूषण व त्याच्यामुळे होणार्‍या नुकसानाची माहिती सर्वसामान्य नागरिकाला होणे आवश्यक आहे.
     
  23. 16 नोव्हेंबर, 2005 रोजी ट्यूनिश येथे महितीगार समजाच्या जागतिक संमेलनात माहितीच्या अधिकाराचा पुनरुच्चार करण्यात आला.

लोकसेवा आयोग जाहिरात

##महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 'सहाय्यक कक्ष अधिकारी' पदांच्या १०७ जागा, 'विक्रीकर निरीक्षक' पदाच्या २५१ जागा आणि पोलीस उप निरीक्षक पदाच्या ६५० जागा असे एकूण १००८ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मे २०१७ आहे.



## महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) मार्फत विविध पदांची सरळसेवा भरती २०१७ करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- ११/०५/२०१७

एकूण जागा :- ५१

पदाचे नाव :-
१) कला संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र ललित कला शिक्षण सेवा, गट - अ - ०१ जागा
२) सहसंचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, सारासे, गट - अ - ०३ जागा
३) शरीरविकृती शास्त्रज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ - ०८ जागा
४) अधिव्याख्याता ( औद्योगिक अर्थशास्त्र ), वर्ग-२ - ०१ जागा
५) संशोधन अधिकारी / सांख्यिकी अधिकारी, सारासे, गट-ब ( राजपत्रित ) - ३८ जागा.

शैक्षणिक पात्रता :-

1)Masters degree

2)-Masters degree ( Commerce, Mathematics, Economics, Biometrics )

3) - MBBS / Masters degree in Pathology or equivalent

4) - Bachelors degree or Masters degree

5) Masters degree ( Commerce, Mathematics, Economics, Biometrics ), M.C.A


फी :- अमागास - ३७३ रु आणि मागासवर्गीय - २७३ रु


##शासनाच्या जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विविध पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) मार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा - २०१७ करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- १०/०५/२०१७

एकूण जागा :- १९९

पदाचे नाव : -

जलसंपदा विभाग
१) सहायक कार्यकारी अभियंता, स्थापत्य गट - अ - ०७ जागा
२) सहायक अभियंता, स्थापत्य गट - अ - २१ जागा
३) सहायक अभियंता, स्थापत्य गट - ब - ६५ जागा

सार्वजनिक बांधकाम विभाग
४) सहायक कार्यकारी अभियंता, स्थापत्य गट - अ - २३ जागा
५) सहायक अभियंता, स्थापत्य गट - ब - ८३ जागा

शैक्षणिक पात्रता :- स्थापत्य अभियांत्रिकी पदवी, B.E ( Civil & water management, Civil & Environmental, Structural, Construction Engineering / Technology )

वयोमर्यादा :- ०१/०८/२०१७ रोजी १९ ते ३८ वर्षे, मागासवर्गीय - १९ ते ४३ वर्षे

फी :-अमागास - ३७३ रु व मागासवर्गीय - २७३ रु.

पूर्व परीक्षा दिनांक - ०९ जुलै २०१७

परीक्षेचे टप्पे : तीन

१) पूर्व परीक्षा १०० गुण

२) मुख्य परीक्षा ४०० गुण

३) मुलाखत ५० गुण

##स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ भाषांतरकार, ज्येष्ठ हिंदी अनुवादक आणि हिंदी प्राध्यापक पदांच्या जागा भरण्यासाठी सामाईक

परीक्षा जून २०१७ मध्ये आयोजित करण्यात आली असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ मे २०१७ आहे


##महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC ) मार्फत महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा २०१७ करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- ०२/०५/२०१७

एकूण जागा :- ७९

पदाचे नाव :- कृषी अधिकारी

शैक्षणिक पात्रता :- बी.एस्सी ( कृषी जैव तंत्रज्ञान, कृषी व्यवसाय तंत्रज्ञान, गृह विज्ञान ) , बी.टेक ( अन्नतंत्र ), बी.एफ.एस्सी, बी.एस्सी ( उद्यानविद्या ).

वय : - १८ ते ३८ वर्षे , मागासवर्गीय -१८ ते  ४३ वर्षे .

फी :- खुला प्रवर्ग - ३७३ रु, मागासप्रवर्ग - २७३ रु.

पूर्व परीक्षा - ३० जुलै २०१७

मुख्य परीक्षा - १७ डिसेंबर २०१७

परीक्षेचे टप्पे - तीन
१) पूर्व परीक्षा - २०० गुण
२) मुख्य परीक्षा - ४०० गुण
३) मुलाखत - ५० गुण

वेतनश्रेणी :- ९३०० - ३४८०० ( ग्रेड पे ४४००

माहितीच्या अधिकाराची वैशिष्ट्ये

माहितीच्या अधिकाराची वैशिष्ट्ये :

  1. माहिती जाणून घेण्याची इच्छा असणार्‍या कोणत्याही व्यक्तीला माहिती मागण्याचा अधिकार आहे.
     
  2. माहिती कोणत्या कारणासाठी हवी आहे हे उघड करणे अर्जदारावर बंधनकारक नसते.
     
  3. माहिती मागण्यासाठी नमुन्यातील अर्ज, संपर्काचा पत्ता आणि 10 रु. शुल्क पुरेसे ठरेल.
     
  4. एखाद्या महितीसाठीचा अर्ज सहाय्यक माहिती अधिकार्‍याकडे दिलेला असेल व सदरचा अर्ज मुख्य कार्यालयाकडे पाठवावयाचा असेल, तर आणखी पाच दिवसांची जास्त मुदत दिली जाऊ शकते.
     
  5. एखाद्या नागरिकाने जीवित स्वातंत्र्य या संदर्भात माहिती मागितली असेल तर ती 48 तासांच्या आत देणे बंधनकारक आहे.
     
  6. जर मागणी केलेली माहिती त्रयस्थ  व्यक्ति किंवा संस्थेची असेल तर ती माहिती देण्यासाठी 40 दिवसांची मुदत आहे.
     
  7. माहितीच्या अधिकारामध्ये कामाचे निरीक्षण किंवा तपासणी या बाबतींचा समावेश करण्यात आला आहे.
     
  8. सर्वसाधारण माहिती एखाद्या व्यक्तीने मागितली असेल तर ती 30 दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे.
     
  9. जनमाहिती अधिकाराच्या निर्णायविरुद्ध प्रथम आपिलीय अधिकार्‍यांकडे 30 दिवसांच्या आत आपिल करता येते.
     
  10. केंद्रीय/राज्य प्रथम आपिल अधिकार्‍यांच्या निर्णायविरुद्ध केंद्रीय/राज्य माहिती आयुक्ताकडे 90 दिवसांच्या आत आपिल करता येते.
     
  11. चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्यास जनमाहिती अधिकार्‍याविरुद्ध कारवाई करता येते.
     
  12. अर्ज सादर केल्यापासुन वेळेच्या आत माहिती न पुरवल्यास दंड आकारणीची तरतूद आहे.
     
  13. अर्ज एका सर्व प्राधिकरणाकडून दुसर्‍या प्राधिकरणाकडे वर्ग केल्यास पाच दिवसात करणे बंधनकारक आहे.
     
  14. माहिती देण्यासाठी व्यवहार्य यंत्रणा उभारणे.
     
  15. राज्य कारभारात पारदर्शकता आणणे.
     
  16. राज्य कारभारात खुलेपणा निर्माण करणे,
     
  17. राज्यकारभार व शासन व्यवस्थेतील भ्रष्टाचारास आळा घालणे.
     
  18. नागरिकांना शासकीय कारभारात सहभागी करून घेणे आणि सहभाग वाढविणे.
     
  19. प्रगल्भ लोकशाहीसाठी माहितगार नागरिक व नागरिकांचे समूह घडविणे.
     
  20. शासन यंत्रणेमध्ये नागरिकांच्या प्रती उत्तरदायित्व निर्माण करणे.

99 वी घटनादुरुस्ती

99 वी घटनादुरूस्ती :

  • ही सर्वात अलिकडील संमत झालेल्या घटनादुरूस्तींपैकी महत्वाची घटनादुरुस्ती आहे. (100 वी घटनादुरुस्ती ही भारत आणि बांगलादेश यांच्यात भूभागांच्या आदानप्रदान संदर्भात आहे. तर GST चा उल्लेख असलेले 121 वे घटनादुरुस्ती विधेयक केवळ लोकसभेने संमत केलेले असल्याने अद्यापही विधेयक (प्रस्तावित घटनादुरुस्ती) या स्वरूपातच आहे.)
     
  • वास्तविक पाहता हे 121वे घटनादुरूस्ती विधेयक होते. परंतु, काही विधेयके संमत न होता रद्द(Lapsed)होतात, पण संमत झालेली घटनादुरूस्ती ही क्रमाने पुढील क्रमांक धारण करते, म्हणून ही 99 वी घटनादुरूस्ती.
     
  • राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली 31 डिसेंबर 2014 रोजी. मात्र कायदा अंमलात आला 13 एप्रिल 2015 पासून.
     
  • ही घटनादुरूस्ती National Judicial Appointment Commission(NJAC) अर्थात राष्ट्रीय न्यायीक नियुक्ती कमिशन च्या संदर्भातील आहे.
     
  • ह्या घटनादुरूस्ती द्वारा राज्यघटनेत 124अ, 124ब, 124क या तीन नवीन कलमांचा समावेश करण्यात आला, तर राज्यघटनेच्या कलम 127, 128, 217, 222, 224अ,231 या कलमांमध्ये दुरुस्ती करण्यात आली.
     
  • ही घटनादुरूस्ती वास्तवात येण्यापूर्वी सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील न्यायाधीशांच्या समितीकडून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणूका, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणूका तसेच बदल्यांबद्दल शिफारशी राष्ट्रपतींकडे केल्या जात व त्या आधारे निर्णय घेतला जाई. कार्यकारी मंडळाला त्यात स्थान नव्हते.मात्र आता घटनादुरूस्तीने हे अधिकार NJAC मिळाले आहेत.
     
  • 124अ या कलमात NJAC ची रचना (Composition) , 124ब या कलमात NJACची कार्ये (Functions) तर 124क मध्ये NJAC च्या कार्यपद्धती (Power of Parliament to make law on procedures) समावेश करण्यात आला आहे.
     
  • 124अ  या कलमात नमूद केल्याप्रमाणे NJAC मध्ये भारताचे सरन्यायाधीश (अध्यक्ष) , सर्वोच्च न्यायालयातील अन्य दोन जेष्ठ न्यायाधीश, विधी आणि न्याय मंत्री, दोन प्रतिष्ठित व्यक्ती यांचा समावेश असेल.
     
  • या प्रतिष्ठित व्यक्तींची नेमणूक सरन्यायाधीश, पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेता यांच्या समितीकडून करण्यात येईल.
     
  • 124ब या कलमात नमूद केल्याप्रमाणे NJAC ची कार्ये पुढील प्रमाणे:
     
  • 1. भारताचे सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश, उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालयातील अन्य न्यायाधीश आदींच्या नेमणूकांबाबत शिफारस करणे.
     
  • 2. उच्च न्यायालयातील मुख्य आणि अन्य न्यायाधीशांच्या बदल्यांबाबत शिफारस करणे.
     
  • 3. न्याय व्यवस्थेत सक्षम आणि सचोटीच्या लोकांची शिफारस करणे.
     
  • अर्थात ह्या घटनादुरुस्तीची वैधता तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठापुढे सद्यस्थितीत सुनावणी सुरु आहे.

दिनविशेष :

  • कृष्णभक्तीचा एक वेगळा पंथ पुष्टिमार्ग स्थापन करणारे थोर पुरुष 'वल्लभाचार्य' यांचा जन्म 26 एप्रिल 1479 मध्ये झाला.
     
  • 26 एप्रिल 1924 हा रमाबाई महादेव रानडेयांचा स्मृतीदिन आहे.
     
  • भारतातील पहिल्या वृत्तपत्रकागदाच्या कारखान्याचे पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते 26 एप्रिल 1956 रोजी उदघाटनकरण्यात आले.

♦️ चालू घडामोडी - ३१ ऑक्टोबर २०१७

#UPSC_MPSC_2018 ▪️ [WBCSD- वर्ल्ड बिजनेस कौन्सिल फॉर सस्टेनेबल डेव्हलोपमेंट सिंगापूरस्थित ओलम इंटरनॅशनलचे सहसंस्थपाक सनी वर्गीस यांना म...