Sunday, October 29, 2017

महाराष्ट्राचा भूगोल (Geography of Maharashtra) Category: Geography (भूगोल)


महाराष्ट्र राज्य:
महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली.
स्थापनेचा वेळी महाराष्ट्रात 26 जिल्हे, 235 तालुके, 4
प्रशासकीय विभाग होते.सध्यास्थितीत महाराष्ट्रात 36 जिल्हे,
355 तालुके, 535 शहरे, 43663 खेडी, 6 प्रशासकीय विभाग
आहेत.
महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग:
1. कोकण ( 30746 चौ.किमी): मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी/
सिंधुदुर्ग.
2. पुणे/प.महाराष्ट्र ( 57268 चौ.किमी): पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
3. नाशिक/खान्देश (574426 चौ.किमी): नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार.
4. औरंगाबाद/मराठवाडा ( 64822 चौ.किमी): औरंगाबाद, जालना, बीड, परभणी,
हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
5. अमरावती/प.विदर्भ ( 46090 चौ.किमी): अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम.
6. नागपूर/पूर्व.विदर्भ ( 51336 चौ.किमी):नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.

नैसर्गिक सीमा :
1. वायव्येस
: सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील
अक्राणी टेकड्या.
2. उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याचा पूर्वेस गाविलगड टेकड्या.
3. ईशान्येस : दरेकासा टेकड्या.
4. पूर्वेस : चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर.
5. दक्षिणेस
: हिरण्यकेशी नदी व कोकणातील
तेरेखोल नदी.
6. पश्चिमेस : अरबी समुद्र.

राजकीय सीमा व सरहद्द :
1. वायव्येस : गुजरात व दादरा नगर हवेली.
2. उत्तरेस : मध्यप्रदेश.
3. पूर्वेस : छत्तीसगड.
4. आग्नेयेस : आंध्र प्रदेश.
5. दक्षिणेस : कर्नाटक व गोवा.

राज्य व त्यांना जोडणारे महाराष्ट्रातील जिल्हे :
1. गुजरात : पालघर, नाशिक, नंदुरबार, धुले
2. दादर नगर हवेली : ठाणे, नाशिक
3. मध्ये प्रदेश
: नंदुरबार, धुले, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपुर, भंडारा,
गोंदिया
4. छत्तीसगड : गोंदिया, गडचिरोली
5. आंध्रप्रदेश : गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ, नांदेड
6. गोवा : सिंधुदुर्ग

महाराष्ट्रचे भारतातील स्थान :
भारतातील 29 राज्यांपैकी एक.
भारताच्या मध्यवर्ती भागात .
महाराष्ट्र राज्य ही उत्तर भारत व दक्षिण भारतात एकत्र
आणणारी विशाल भूमी आहे .
1. विस्तार
अक्षांक : 15° 41’ उत्तर अक्षवृत्त ते 22° 6’ उत्तर अक्षवृत्त.
रेखांश : 72° 36’ पूर्व रेखांश ते 80° 54’ पूर्व रेखावृत्त.
2. आकार
व्हीव्हीत्रिकोणाकृती, दक्षिणेस चिंचोळा तर
उत्तरेस रुंद.
पाया – कोकणात व निमुळते टोक विदर्भात.
3. लांबी, रुंदी व क्षेत्रफळ
लांबी = पूर्व – पश्चिम – 800 किमी.
रुंदी = दक्षिण – उत्तर – 720 किमी.
क्षेत्रफळ = 307713 चौ.किमी.
क्षेत्रफळाच्या द्रुष्टीने भारतात राजस्थान, मध्येप्रदेश नंतर महाराष्ट्रचा 3
रा क्रमांक लागतो.
महाराष्ट्राने देशाचा 9.36% भाग व्यापला आहे.
समुद्रकिनारा 720 किमी. लांबीचा आहे.

जिल्हे निर्मिती :
1. 1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग ( 27 वा जिल्हा )
औरंगाबादपासून – जालना ( 28 वा जिल्हा )
2. 16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून – लातूर ( 29 वा जिल्हा ),
26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली ( 30 वा जिल्हा )
3. 1990 : मुंबईपासून – मुंबई उपनगर ( 31 वा जिल्हा )
4. 1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार ( 32 वा जिल्हा )
अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा )
5. 1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली ( 34 वा जिल्हा )
भंडारा – गोंदिया ( 35 वा जिल्हा )
6. 1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून – पालघर ( 36 वा जिल्हा )

No comments:

Post a Comment

♦️ चालू घडामोडी - ३१ ऑक्टोबर २०१७

#UPSC_MPSC_2018 ▪️ [WBCSD- वर्ल्ड बिजनेस कौन्सिल फॉर सस्टेनेबल डेव्हलोपमेंट सिंगापूरस्थित ओलम इंटरनॅशनलचे सहसंस्थपाक सनी वर्गीस यांना म...