Friday, June 30, 2017
आवाजी मतदान म्हणजे काय?
मित्रांनो महाराष्ट्र विधान सभेत आवाजी मतदानाने विश्वास समर्थन प्रस्ताव मंजूर करण्यात आला. चला आता जाणून घेवू या कि आवजी मतदान हा काय प्रकार आहे . साधारणत: एखाद्या विधेयकावर आमदारांनी मांडलेल्या सूचना किंवा प्रस्तावावर आवाजी मतदान घेण्यात येते. या प्रकारच्या मतदानात आमदार त्यांचा होकार किंवा नकार, होय किंवा नाही हे बोलून सांगतात. हि मतदान पद्धतीतील सर्वात सोपी व सुलभ पद्धत आहे.
ह्या पद्धतीत सभापती प्रस्तावावर सभागृहातील सभासदांना त्यांचा होकार किंवा नकार होय किंवा नाही म्हणून सांगावयास लावतात. आधी ते होकार असणार्यांना विचारतात व नंतर नकार असणार्यांना त्यांचे मत विचारतात.
त्यानंतर ते त्यांचा ढोबळ मानाने घेतलेला निर्णय सभागृहाला देतात. हि मतदान पद्धती सदोष आहे व अचूक निर्णय होईलच याची खात्री नसते विशेषत: जेव्हा हो आणि नाही म्हणणाऱ्यांची संख्या जवळपास सारखीच असते. अशा स्थितीत एखाद्या सदस्याने मागणी केल्यास मतविभागणी द्वारे किंवा इतर पद्धतीने मतदान करण्याची घटनेत तरतूद आहे.
आवाजी मतदानात किती मते मिळाली याची नोंद कामकाजात केली जात नाही मात्र इतर पद्धतीच्या मतदान पद्धतीत मिळालेल्या मतांची नोंद केली जाते.
भारताखेरीज हि पद्धत अमेरिका व इंग्लंड मध्ये वापरण्यात येते . अमेरिकेत ९५ % विधेयके या पद्धतीनेच संमत करण्यात येतात.
भारतात हि पद्धती लोकसभा, राज्यसभा व घटक राज्यांच्या विधानसभेत विधेयक संमत करण्यास वापरली जाते.
हि पद्धती जेव्हा सभागृहात मतैक्य नसते तेव्हा वापरली जाते. तेलंगाणा राज्याला २९व्या राज्याचा दर्जा देण्यासाठी ह्या पद्धतीचा वापर करण्यात आला.
१४ ऑगस्ट २०१४ रोजी राज्यसभेने न्यायाधीशांच्या नेमणुकीच विधेयक आवाजी मतदान पद्धतीने संमत केले होते
१२ नोव्हेंबर २०१४ रोजी भाजपा ने विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने संमत केला , शिवसेना व कॉंग्रेसने या बाबत प्रश्नचिन्ह उभे केले असून मतविभागणी ची मागणी केली
Wednesday, June 28, 2017
चालू घडामोडी gk
1). नुकतेच युनिसेफ या आंतरराष्ट्रीय संस्थेने १९ वर्षीय निर्वासित मजून एल्मेलेहनला सर्वात तरुण सदिच्छा दूत बनवले आहे, ही तरुणी कोणत्या देशातील निर्वासित आहे . ?
A). कतार
B). इराण
C). अफगाणिस्तान
D). *सीरिया*✔✔
☀☀☀☀☀☀☀☀☀☀☀
2). जीएसटीच्या प्रबोधनात्मक प्रचार करण्याची जबाबदारी पुढील कोणत्या अभिनेत्यावर सोपविण्यात आली असून वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) ब्रॅंड अँबेसिडर म्हणून त्यांची निवड झाले आहे .?
A). अजय देवगण
B). *अमिताभ बच्चन*✔✔
C). विवेक ओबेरॉय
D). सैफ अली खान
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
3). संयुक्त राष्ट्रसंघाच्या अत्यंत प्रमुख अशा आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणसंबंधी परिषदेच्या सदस्यपदी आशियातील कोणत्या देशाची पुनर्निवड झाली आहे.?
A). जपान
B). पाकिस्तान
C). *भारत*✔✔
D). चीन
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
4). राष्ट्रपतीपदासाठी भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून रामनाथ कोविंद यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांनी नुकताच कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे .?
A). राजस्थान
B). मध्यप्रदेश
C). उत्तराखंड
D). *बिहार*✔✔✔
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
5). ट्रेडमार्क प्राप्त करणा-या जगातील बांधकामांमध्ये भारतामधील पहिली इमारत म्हणून मुंबईमधील कोणत्या हॉटेलला स्वतःचे ट्रेडमार्क प्राप्त झाले आहे. ?
A). *ताज महाल पॅलेस*✔✔
B). ट्रेबो गार्डन
C). ट्रायडेंट बांद्रा - कुर्ला
D). द ग्रँड हयात
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
6). पूर्वीच्या सोवियत संघाकडून घेतलेल्या व जुन्या झालेल्या मिग लढाऊ विमानांची जागा घेण्यासाठी भारतीय हवाई दलास लागणा-या पुढील कोणत्या लढाऊ विमानांचे उत्पादन भारत सरकारच्या 'मेक-इन-इंडिया' योजनेखाली भारतातच करण्यात येणार आहे.?
A). F-7
B). F-20
C). *F-16*✔✔✔
D). F-15
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
7). भारतात वैज्ञानिक संशोधन संस्थांचे जाळे निर्माण करणारे कुशल संघटक आणि पेटंटचे महत्त्व अधोरेखित करणारे देशभक्त शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना यंदाचा कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे. ?
A). *राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार*✔✔✔
B). लोकमान्य टिळक पुरस्कार
C). महाराष्ट्र भूषण पुरस्कार
D). कुसुमाग्रज प्रतिष्ठाण पुरस्कार
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
8). वादग्रस्त विषय असल्याकारणाने पुढीलपैकी कोणत्या माहितीपटाना नुकतीच केंद्र सरकारने प्रदर्शित करण्यासाठी परवानगी नाकारली आहे.?
A). द अनबेअरेबल बिंग ऑफ लाईटनेस
B). मार्च-मार्च-मार्च
C). इन द शेड ऑफ फॉलन चिनार
D). *वरीलपैकी सर्व बरोबर*✔✔✔
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
9). देशात विविध राज्यात शेतक-यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलने सुरू केली असून नुकतीच पंजाब सरकारने सरसकट किती लाख रूपये कर्जमाफी जाहीर केली आहे.?
A). एक लाख
B). *दोन लाख*✔✔✔
C). पाच लाख
D). दहा लाख
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
10). सिंधू नदीवर डायमेर-भाषा धरण बांधण्यासाठी भारताचा विरोध असल्यामुळेच पुढीलपैकी कोणत्या बँकांनी पाकिस्तानला निधी देण्यास नकार दिला आहे. ?
A). जागतिक बँक
B). एशियन डेव्हलपमेंट बँक
C). *दोन्ही बरोबर*✔️✔️✔️
D). फक्त २
🌴🌴🌴🌴 🌴🌴🌴🌴
** . नुकत्याच योग दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील प्रज्ञा पाटील यांनी किती तास सलगपणे योगासने करून नव्या विश्वविक्रमाची नोंद केली आहे. ?
*उत्तर-- 103*...
नागपूर प्रशाकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर)
नागपूर प्रशाकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 3)
चंद्रपूर व भंडारा येथे कश्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते? - तांदूळ.
कामठी येथे कशाच्या खाणी आहेत? - दगडी कोळसा.
महाराष्ट्रात सर्वाधिक जस्त उत्पादन करणारा जिल्हा कोणता? - नागपूर.
तांबे कोणत्या जिल्ह्यात विपुल प्रमाणात मिळते? - चंद्रपुर.
भंडारा जिल्ह्यात मंगल धातूच्या खाणी कोठे आहे? - तुमसर.
महाराष्ट्र खाण महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? - नागपूर.
कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक शिसे मिळते? - नागपूर.
रामटेक कोणत्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? - मॅगनीज.
लोखंडासाठी प्रसिद्ध असलेले देऊळगाव कोणत्या जिल्ह्यात आहे? - गडचिरोली.
सावनेर कशासाठी प्रसिद्ध आहे? - मॅगनीज.
कायनाईटच्या खाणी कोठे आहेत? - देहुगाव-भंडारा.
क्रोमईट कोठे सापडते? - भंडारा.
अभ्रक कोठे मिळते? - नागपूर.
सर्वाधिक लोखंड कोणत्या जिल्ह्यात मिळते? - नागपूर.
चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या प्रकारची माती आढळते? - तांबडी माती.
तापी व पूर्णा खोर्यात कोणती माती आढळते? - गाळमिश्रीत.
भंडारा जिल्ह्यात कोणती माती आढळते? - उथळ व चिकन.
महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये कोणता संयुक्त प्रकल्प आहे? - तेलगु-गंगा.
इंचमपल्ली प्रकल्प संयुक्तपणे राबवणारी राज्ये कोणती? - महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश.
लेंडी प्रकल्पात महाराष्ट्राने कोणत्या राज्याचे सहकार्य घेतले आहे? - आंध्रप्रदेश.
पेंच प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्यांने उभारला गेला आहे? - मध्यप्रदेश.
इडियाडोह योजना कोठे आहे? - भंडारा-चंद्रपूर.
बांध योजना कोणत्या जिल्ह्यात आहे? - भंडारा.
पेंच योजनेचा फायदा कोणत्या जिल्ह्यांना होतो? - नागपूर-भंडारा.
महाराष्ट्रात सर्वाधिक तलावांचा जिल्हा कोणता? - भंडारा व गोंदिया.
बोर नदीवरील यशवंत धरण कोठे आहे? - वर्धा.
रामटेक कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? - न
नागपूर प्रशाकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग2)
खनिज कोळसा कोठे मिळतो? - भंडारा व गोंदिया.
चंद्रपूर पेक्षा अधिक जंगलमय जिल्हा कोणता? - गडचिरोली.
नागपूर टाईम्स हे दैनिक कोठून प्रसिद्ध होते? - नागपूर.
'नागपूर पत्रिका' हे नियतकालीक कोठून प्रसिद्ध होते? - नागपूर.
रामटेक कोणत्या टेकड्यावर वसलेले आहे? - रामगिरी पर्वत.
कालिदासाने मेघदुत काव्य कोठे लिहिले? - रामटेक.
ब्राम्हण कालीन शिल्पकलेचा नमुना असलेली राम, लक्ष्मण, सीता यांची मंदिरे कोठे आहेत? - रामटेक.
फ्यूअल इंस्टूमेंट अँड इंजिनियर्स लि. ही संस्था कोठे आहे? - पांढरकवढा.
विकर पॉवर संस्था कोठे आहे? - आर्वी.
नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज कोठे आहे? - नागपूर.
भांदक बौद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? - चंद्रपूर.
उपग्रह दळणवळण केंद्र कोठे आहे? - आर्वी.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल कोठे आहे? - नागपूर.
गांधीजीचा सेवाश्रम कोठे आहे? - वर्धा.
विदर्भातील प्रमुख शैक्षणिक केंद्र कोणते? - नागपूर.
महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोठे आहे? - चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर येथे.
जवसाचे तेल काढण्याच्या गिरण्या मुख्यत: कोणत्या विभागात आहेत? - नागपुर.
महाराष्ट्रात कागद उद्योग कोठे विस्तारला आहे? - बल्लारपूर.
मॅग्नीज शुद्ध करण्याचा कारखाना कोठे आहे? - तुमसर.
नागपूर जिल्ह्यात एकोडी कशासाठी प्रसिद्ध आहे? - रेशमी कापड.
रेशमी कापडासाठी प्रसिद्ध असलेले सावली कोणत्या जिल्ह्यात आहे? - चंद्रपूर.
महाराष्ट्रात कोणत्या नदीचे खोरे खनिज उत्पादनात मोठे आहे? - वर्धा नदी.
महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी पितळी भांडी तयार केली जातात? - भंडारा.
कंहान-रामटेक हा कोणत्या प्रकारचा मार्ग आहे? - ब्रॉडगेज.
महाराष्ट्रात एक्स्प्रेस कोठून कोठे धावते? - गोंदिया-कोल्हापूर.
विदर्भ एक्स्प्रेस कोणत्या शहरा दरम्यान धावते? - मुंब��
महाराष्ट्र GK
सातवाहनाची राजधानी कोणती? - रत्नागिरी.
रायगड जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे? - अलिबाग.
महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता?- सिंधुदुर्ग.
रायगड जिल्हा कोणत्या विभागात आहे? - कोकण.
कोकण किनारपट्टी व महाराष्ट्राचे पठार यांच्या दरम्यानचा पर्वत कोणता? - सहयाद्रि.
महाराष्ट्राचे नैसर्गिक रचनेच्या दृष्टीने किती भाग पडतात? - चार.
महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? - अरबी.
कोणते भुरुप दक्षिण कोकणचे वैशिष्ट आहे? - सडा.
मुंबई विभागातील नवीन जिल्हा कोणता? - मुंबई उपनगर.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे? - गोवा.
कोकण व पठार असे स्वाभाविक बिभाग कशामुळे पडले आहेत? - सह्याद्रि पर्वतामुळे.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता? - मुंबई.
कोणत्या जिल्ह्याच्या दक्षिणेस गोवा व कर्नाटक सीमा एकत्र येतात? - सिंधुदुर्ग.
कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे? - रत्नागिरी.
तेरेखोल पूलामुळे कोणती दोन राज्ये जोडली आहेत? - महाराष्ट्र-गोवा.
महाराष्ट्रातील कोणत्या भागात 2500 ते 3000 मिलीमीटर पाऊस पडतो? - कोकण.
महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वाधिक पाऊस पडतो? - कोकण.
कोणत्या पर्वतामुळे कोकण किनारपट्टीस पाऊस पडतो? - सह्याद्रि.
कोकणात सर्वाधिक पाऊस पाडण्याचे कारण? - अरबी समुद्रावरील चक्रीवादळ.
खारे वारे कसे वाहतात? - दिवसा समुद्राकडून जमिनीकडे.
माथेरान थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? - रायगड.
कोल्हापूर - रत्नागिरी रस्त्यावर कोणता घाट लागतो? - अंबाघाट.
कोल्हापूर - सावंतवाडी या मार्गावर कोणता घाट लागतो? - अंबोली.
कराड - चिपळून रस्त्यावरील घाट कोणता? - कुभांर्ली.
पश्चिम घाटाची निर्मिती कशामुळे झाली आहे? - प्रस्तरभंगामुळे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थं��
पंचायतराज विषयी......
🔹महाराष्ट्रातील पंचायत राज-
आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.
🌻1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
==> स्थानिक स्वराज्य संस्था
🌻2. राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
==> 2 ऑक्टोबर 1953
🌻3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
==> 16 जानेवारी 1957
🌻4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
==> वसंतराव नाईक समिती
🔘5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
==> 27 जून 1960
🌻6. वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
==> महसूल मंत्री
🔘7. वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
==>226
🌻8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
==> जिल्हा परिषद
🔘9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
==> तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)
🌻10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
==> 1 मे 1962
🌻11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
==> महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966
🔘12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
==> 7 ते 17
🌻13. ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
==>जिल्हाधिकारी
🔘14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?
==> जिल्हाधिकारी
🌻15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
==> 5 वर्षे
🌻16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कधी पासून मोजला जातो ?
==> पहिल्या सभेपासून
🌻17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
==> तहसीलदार
🌻18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
==> विभागीय आयुक्त
🌻19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> सरपंच
🌻20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
=पंचायत समिती सभापती
🌻21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
==> दोन तृतीयांश (2/3)
🔘22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
==> तीन चतुर्थांश (3/4)
🌻23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> पंचायत समिती सभापती
🔘24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> जिल्हा परिषद अध्यक्ष
🌻25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> संबंधित विषय समिती सभापती
🌻26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> जिल्हा परिषद अध्यक्ष
🌻27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
==> विभागीय आयुक्त
🌻28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
==> ग्रामसेवक
🌻29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
==> जिल्हा परिषदेचा
🌻30. ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
==> जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून
🌻31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
==> ग्रामसेवक
🌻32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
==> शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)
🌻33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
==> राज्यशासनाला
🔘34. सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
==> विस्तार अधिकारी
🌻35. गटविकास अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे ?
==> ग्रामविकास खाते
🌻36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
==> जिल्ह्याचे पालकमंत्री
🔘37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
==> जिल्हाधिकारी
🌻38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
==> दहा (स्थायी+9 विषय समित्या)
🌻39. जिल्हा परिषदेच्या समित्या कोणत्या आहेत ?
==> स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा
🌻40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?
==> जिल्हा परिषद अध्यक्ष
🌻41.महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
==> वसंतराव नाईक
Tuesday, June 27, 2017
Current Affairs Marathi
🔹राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अंतिम मसुदा तयार करण्यासाठी एक समिती गठित
वैज्ञानिक डॉ. के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अंतिम मसुदा तयार करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. समितीचे इतर 8 सदस्य आहेत.
गेल्या तीस महिन्यांपासून मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत अभ्यास केला जात आहे. हजारो सूचना, शिफारसी, चर्चासत्र आयोजित करून व्यापक अभ्यासासाठी माहिती गोळा केली गेली आहे. MyGov व्यासपीठाचा यासाठी वापर करण्यात आला.
🔹तिरुवानंतपुरम येथे अनुयात्रा मोहिमेला सुरुवात
12 जून 2017 रोजी तिरुवानंतपुरम येथे भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते विशेष गरजा असलेल्या व्यक्तींसाठी “अनुयात्रा” मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले आहे.
“अनुयात्रा” मोहिम ही केरळ राज्य सरकारची अभिनव आणि महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. जादूचे विशेष प्रशिक्षण मिळालेल्या शारीरिकदृष्ट्या-विकलांग बालकांच्या गटाला ब्रँड अम्बॅसडर केले गेले आहे. हा कार्यक्रम मॅजिक अकॅडेमीच्या सहकार्याने केरळ सोशल सेक्युरिटी मिशन (KSSM) कडून राबविण्यात येत आहे. यासाठी 31 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
🔹सरकारची कृषिकर्जावर 2% व्याजदर आकारण्यास मंजूरी
मंत्रिमंडळाने वर्ष 2017-18 मध्ये शेतकरी समुदायांना स्वस्त कर्ज उपलब्ध करविण्यासाठी इंटरेस्ट सबव्हेशन स्कीम (ISS) मंजूर केली आहे. यासाठी 20,339 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
ISS नुसार, शेतकर्यांना 3 लाख रुपयांपर्यंत शेतकर्यांना त्यांच्या उत्पादनाची साठवणीसाठी सहा महिन्यांसाठी 7% इतक्या अनुदानित व्याजदराने अल्पकालीन पीक कर्ज आणि नियमितपणे कर्ज फेडणार्या शेतकर्यांना 4% व्याजदराने पीक कर्ज मिळणार आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित शेतकऱ्यांना पुनर्रचित रकमेच्या पहिल्या वर्षासाठी 2% व्याजदराने अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. 2006-07 सालापासून ISS योजना चावण्यात येत आहे. या योजनेची अंमलबजावणी राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (NABARD) आणि भारतीय रिझर्व्ह बँक करीत आहेत. साधारणपणे, पीक कर्जावर 9% व्याजदर आकारला जातो.
🔹आरोग्य मंत्रालयाकडून तीव्र अतिसार नियंत्रण पंधरवडाचा शुभारंभ
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 14 जून 2017 रोजी अतिसारमुळे होणारे बाल मृत्यू कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये वाढ करण्यासाठी ‘तीव्र अतिसार नियंत्रण पंधरवडा (Intensified Diarrhoea Control Fortnight –IDCF)' चा शुभारंभ केला आहे.
जागतिक सर्वसामान्य स्तरापर्यंत देशातील बालकांचे आरोग्य सुधारून त्यासामान पातळीवर आणण्यासाठी मंत्रालयाने या कार्यक्रमाला राष्ट्रीय प्राथमिकता बनविला आहे.
आरोग्य कर्मचारी, राज्य सरकार आणि इतर हितधारकांना अतिसारच्या नियंत्रणात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देण्यास उत्तेजन दिले जाईल. सर्वात प्रभावी आणि कमी-किंमतीच्या तोंडावाटे घेतल्या जाणार्या ओरल रिहायड्रेशन सॉल्ट (ORS) मिश्रीत पाणी आणि जस्तच्या गोळ्या यांचा उपयोग करण्याविषयी जागृती निर्माण केली जाईल. या कार्यक्रमांतर्गत संपूर्ण देशभरात 5 वर्षाखालील सुमारे 12 कोटी बालकांचा समावेश करण्यात येणार आहे.
कार्यक्रमामध्ये समाविष्ट बाबी
आशा कार्यकर्ता त्यांच्या गावात पाच वर्षाखालील मुलं-मुली असलेल्या कुटुंबांना ORS पॅकेटचे वाटप करणार.
शाळा आणि अंगणवाडी यासारख्या आरोग्य देखरेख केंद्रांच्या आणि गैर आरोग्य देखरेख केंद्रांच्या ठिकाणी ORS-झिंक कॉर्नरची स्थापना केली जाणार.
फ्रन्टलाइन कार्यकर्ता ORS चे पाणी तयार करण्याची विधी स्पष्ट करणार आणि खान-पान, स्वच्छता यासंबंधी समुपदेशन करणार.
▪️अतिसार बाबत स्पष्टता
अतिसार हा लहान बालकांना होणारा सर्वसामान्य आजार आहे. हगवणामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन मृत्युचा धोका संभवतो. मात्र, अतिसारमुळे होणारे जवळजवळ सर्व मृत्यू ORS मिश्रीत पाणी आणि जस्त (झिंक) च्या गोळ्यांचे सेवन करून टाळता येतात. सोबतच आहारामधून पुरेसे पोषक तत्व देणे आवश्यक आहे. सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छता, स्तनपान/योग्य पोषण आणि हात धुणे अश्या विविध पद्धतीतून अतिसार टाळता येऊ शकतो.
भारतात प्रत्येक वर्षी अंदाजे 10.1 लाख बालकांचा मृत्यू होतो आणि त्यात अतिसारमुळे होणारे मृत्यू अंदाजे 1.1 लाख इतके आहे.
Monday, June 26, 2017
महाराष्टाचा थोडक्यात भूगोल
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर कोणती मृदा आढळते? - खारी
माती.
कोकण विभागात कोणती मृदा आढळते? - तांबडी-जांभी.
लोह व अल्युमिनीअमचे अधिक प्रमाण असणारी महाराष्ट्रातील माती कोणती? - जांभी.
रत्नागिरी जिल्ह्यात कोणती माती आढळते? - जांभी.
महाष्ट्रात कोणत्या ठिकाणी क्रोमाइट सापडते? - रत्नागिरी.
डोलोमाईट महाष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? - रत्नागिरी.
गरम पाण्याचे झरे असलेले साव व पाली कोणत्या जिल्ह्यात आहे? - रायगड.
गरम पाण्यासाठी प्रसिद्ध असलेले राजापूर कोणत्या जिल्ह्यात आहे? - रत्नागिरी.
काजुसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? - मालवण.
अलिबाग कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? - कलिंगड.
वसई कशासाठी प्रसिद्ध आहे? - केळी.
चिकूसाठी प्रसिद्ध असलेले शहर कोणते? - डहाणू.
लिची ही फळझाडे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? - ठाणे.
कोकणात प्रायोगिक तत्वावर कशाची लागवड करण्यात आलेली आहे? - निलगिरी.
सर्वाधिक तांदुळ पिकवणारा जिल्हा कोणता? - रायगड.
सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा कोणता? - रत्नागिरी.
कोणत्या जिल्ह्यात स्त्रियांपेक्षा पुरुषाचे प्रमणा जास्त आहे? - मुंबई शहर.
सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? - मुंबई उपनगर.
भात व मासे महाराष्ट्रातील कोणत्या लोकांचे अन्न आहे? - कोकणी.
रायगड जिल्ह्यातील आदिवासी जमात कोणती? - कातकरी.
महादेव कोळी, वारली, पारधी, ठाकर, भिल्ल या जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात आढळतात? - ठाणे.
आगरी आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते? - ठाणे.
अप्सरा-अनुभट्टी कोठे आहे? - तारापूर.
भारतातील अॅटोमिक पॉवर प्लॅट कोणत्या ठिकाणी आहे? - तारापूर.
तारापूर अणू वीज केंद्राची स्थापना कोणत्या वर्षी झाली? - 1969.
मुंबई-गोवा मार्गावर कोणते शहर आहे? - वसई.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 हा कोणता मार्ग म्हणून ओळखला जातो? - मुंबई-गोवा.
रत्ना�
भारताची सामान्य माहिती
भारताचे क्षेत्रफळ : 32,87,263 चौ.कि.मी.
भारताची लांबी (दक्षिण-उत्तर) : 3,214 कि.मी.
भारताची रुंदी (पूर्व-पश्चिम) : 2,933 कि.मी.
भारताचे जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भू भागाशी प्रमाण : 23%
भारताच्या भू-सीमा : 15,200 कि.मी.
भारताला स्पर्श करणारे एकूण देश : सात
भारताची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 121,01,93,422
भारताची पुरुष संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 62,37,24,248
भारताची स्त्री संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 58,64,69, 174
भारताचा साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 74.04%
पुरुष साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 82.14%
महिला साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 64.46%
भारताची घनता सन 2011 च्या जनगणनेनुसार : 382 प्रति चौ.किमी.
भारतास लाभलेला समुद्रकिनारा : 7,517 कि.मी.
भारताची राजधानी : दिल्ली
भारताचे राष्ट्रगीत : जन-गण-मन
भारताचे ध्येय वाक्य : सत्य मेव जयते
राष्ट्रीय गीत : वंदेमातरम
'जन-गण-मन' या राष्ट्रगीताचे कवि : रविंद्रनाथ टागोर
राष्ट्रीय गीत 'वंदेमातरम' चे कवी : बंकीमचंद्र चटर्जी
भारताचा राष्ट्रध्वज : तिरंगी झेंडा
राष्ट्रीय फळ : आंबा
राष्ट्रीय फूल : कमळ
भारताचा राष्ट्रीय पक्षी : मोर
भारताचा राष्ट्रीय प्राणी : वाघ
भारतात एकूण घटक राज्ये : 28
भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश : 7
भारतात सर्वाधिक साक्षर राज्य : केरळ
भारतात सर्वात कमी साक्षर राज्य : बिहार
भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रदेश : राजस्थान
भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा : ठाणे (महाराष्ट्र)
आंतरराष्ट्रीय दिनविशेष
• जागतिक हास्यदिन - 10 जानेवारी
• जागतिक सीमाशुल्क दिन - 26 जानेवारी
• जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन - 30 जाने
• जागतिक पाणथळ/विवाह दिन - 4 फेब्रु
• जागतिक कर्करोग दिन - 4 फेब्रुवारी
• जागतिक रूग्ण हक्क दिन - 11 फेब्रुवारी
• जागतिक प्रेम दिन - 14 फेब्रुवारी
• जागतिक सामाजिक स्वच्छता दिन -20 फेबु
• जागतिक सामाजिक न्याय दिन - 20 फेब्रु
• जागतिक मातृभाषा दिन - 21 फेब्रुवारी
• जागतिक महिला दिन - 8 मार्च
• जागतिक ग्राहक दिन - 15 मार्च
• जागतिक अपंग दिन - 17 मार्च
• जागतिक चिमणी दिन - 20 मार्च
• जागतिक वन दिन - 21 मार्च
• जागतिक जल दिन - 22 मार्च
• जागतिक हवामान दिन - 23 मार्च
• जागतिक क्षयरोग दिन - 24 मार्च
• जागतिक रंगभूमी दिन - 27 मार्च
• जागतिक आरोग्य दिन - 7 एप्रिल
• जागतिक होमीओपॅथी दिन - 10 एप्रिल
• जागतिक वारसा दिन - 18 एप्रिल
• जागतिक वसुंधरा दिन - 22 एप्रिल
• जागतिक पुस्तक दिन - 23 एप्रिल
• जागतिक कॉपीराईट दिन - 23 एप्रिल
• जागतिक बौद्धीक संपदा दिन - 26 एप्रिल
• जागतिक कामगार दिन - 1 मे
• जागतिक सौरदिन - 3 मे
• जागतिक रेडक्रॉस दिन - 8 मे
• जागतिक कुटुंब दिन - 15 मे
• जागतिक दूरसंचार दिन - 17 मे
• जागतिक दहशतवाद विरोधी दिन - 21 मे
• जागतिक राष्ट्रकुल दिन - 24 मे
• जागतिक तंबाखूविरोधी दिन - 31 मे
• जागतिक दूध दिन - 1 जून
• जागतिक पर्यावरण दिन - 5 जून
• जागतिक बालरक्षक दिन - 6 जून
• जागतिक बालकामगार मुक्ती दिन - 12 जून
• जागतिक रक्तदान दिन - 14 जून
• जागतिक योग दिन - 21 जून
• जागतिक ऑलिम्पिक दिन - 23 जून
• जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन-26 जून
• जागतिक लोकसंख्या दिन - 11 जूलै
• जागतिक नेल्सन मंडेला दिन - 18 जूलै
• जागतिक वनसंवर्धन दिन - 23 जूलै
• जागतिक हिरोसिमा दिन - 6 ऑगस्ट
• जागतिक विश्वशांती दिन - 6 ऑगस्ट
• जागतिक नागसाकी दिन - 9 ऑगस्ट
• जागतिक युवक दिन - 12 ऑगस्ट
• जागतिक जेष्ठ नागरिक दिन - 21 ऑगस्ट
• जागतिक नारळ दिन - 2 सप्टेंबर
• जागतिक साक्षरता दिन - 8 सप्टेंबर
• जागतिक अभियंता दिन - 15 सप्टेंबर
• जागतिक लोकशाही दिन - 15 सप्टेंबर
• जागतिक ओझोन दिन - 16 सप्टेंबर
• जागतिक शांतता दिन - 21 सप्टेंबर
• जागतिक पर्यटन दिन - 27 सप्टेंबर
• जागतिक हृदयरोग दिन - 30 सप्टेंबर
• जागतिक वृद्ध दिन - 1 ऑक्टोंबर
• जागतिक अहिंसा दिन - 2 ऑक्टोंबर
• जागतिक शिक्षण दिन - 5 ऑक्टोंबर
• जागतिक अंध दिन - 15 ऑक्टोंबर
• जागतिक विद्यार्थी दिन - 15 ऑक्टोंबर
• जागतिक अन्न दिन - 16 ऑक्टोंबर
• जागतिक दारिद्र निर्मुलन दिन - 17 ऑक्टो
•जागतिक आयोडिन कमतरता दिन-21ऑक्टो
• जागतिक युनो दिन - 24 ऑक्टोबर
• जागतिक इंटरनेट दिन - 29 ऑक्टोबर
• जागतिक युनेस्को दिन - 4 नोव्हेंबर
• जागतिक विज्ञान दिन - 10 नोव्हेंबर
• जागतिक मलाला दिन - 10 नोव्हेंबर
• जागतिक शौचालय दिन - 19 नोव्हेंबर
• जागतिक पर्यावरण संवर्धन दिन -25 नोव्हे
• जागतिक एड्स दिन - 1 डिसेंबर
• जागतिक संगणक साक्षरता दिन - 2 डिसें
• जागतिक अपंग दिन - 3 डिसेंबर
• जागतिक मानवी हक्क दिन - 10 डिसेंबर
• जागतिक युनिसेफ दिन - 11 डिसेंबर
• जागतिक जैवविविधता दिन - 29 डिसेंबर
राष्ट्रीय दिनविशेष -
• राष्ट्रीय प्रवासी दिन - 9 जानेवारी
• राष्ट्रीय युवक दिन - 12 जानेवारी (स्वामी विवेकानंद जयंती)
• राष्ट्रीय भूदल दिवस - 15 जानेवारी
• राष्ट्रीय भुगोल दिन - 15 जानेवारी
• राष्ट्रीय बालिका दिन - 24 जानेवारी
• राष्ट्रीय पर्यटन दिन - 25 जानेवारी
• राष्ट्रीय मतदार दिन - 25 जानेवारी
• राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन - 26 जानेवारी
• राष्ट्रीय हुतात्मा दिन - 30 जानेवारी
• राष्ट्रीय विज्ञान दिन - 28 फेब्रुवारी(सी.व्ही.रमन जन्म)
• राष्ट्रीय व्यसनमुक्ती दिन - 29 फेब्रुवारी
• राष्ट्रीय संरक्षण दिन - 3 मार्च
• राष्ट्रीय टपाल दिन - 10 ऑक्टोबर
• राष्ट्रीय ऐक्य दिन - 20 ऑक्टोबर
• राष्ट्रीय एकात्मता दिन - 31 ऑक्टोबर (इंदिरा गांधी स्मृतीदिन)
• राष्ट्रीय एकता दिन - 31 ऑक्टोबर (वल्लभभाई पटेल जयंती)
• राष्ट्रीय शिक्षण दिन - 11 नोव्हेंबर (मो. आझाद जयंती)
• राष्ट्रीय पक्षी दिन - 12 नोव्हेंबर
• राष्ट्रीय बालकदिन - 14 नोव्हेंबर
• राष्ट्रीय नौदल दिन - 4 डिसेंबर
• राष्ट्रीय ध्वज दिन - 7 डिसेंबर
Sunday, June 25, 2017
भारताचे जनक/शिल्पकार
आधुनिक भारताचे जनक- राजा राममोहन रॉय
आधुनिक भारताचे शिल्पकार - पंडित जवाहरलाल नेहरू.
भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी.
भारतीय राष्ट्रवादाचे जनक - सुरेंद्रनाथ चटर्जी
भारतीय असंतोषाचे जनक - लोकमान्य टिळक.
भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार – सरदार वल्लभभाई पटेल.
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक - आचार्य बाळशास्त्री जांभेकर.
भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक - दादासाहेब फाळके.
भारताच्या अनुविज्ञानाचे जनक - डॉ.होमी भाभा.
आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - ह.ना.आपटे.
आधुनिक मराठी कवितेचे जनक - केशवसुत.
स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक - लॉर्ड रिपन.
भारताच्या हरितक्रांतीचे जनक - डॉ.एम.एस.स्वामिनाथन.
भारताच्या धवलक्रांतीचे जनक - डॉ.व्हार्गीस कुरियन.
भारतीय भूदान चळवळीचे जनक - आचार्य विनोबा भावे.
भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार - विक्रम साराभाई.
भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक - सॅम पित्रोदा.
महाराष्ट्रातील धोर मराठी साहित्यिक व त्यांची टोपण नावे
कवी/साहित्यिक टोपण नावे
कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
गोविंद विनायक करंदीकर - विंदा करंदीकर
त्र्यंबक बापुजी डोमरे - बालकवी
प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज
विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
निवृत्ती रामजी पाटील - पी. सावळाराम
माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव जुलिअन
चिंतामण त्र्यंबक खानोलकर - आरती प्रभू
आत्माराम रावजी देशपांडे - अनिल
महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, - पाडेगांव (सातारा)
गवत संशोधन केंद्र, - पालघर (ठाणे)
नारळ संशोधन केंद्र, - भाटय़े (रत्नागिरी)
सुपारी संशोधन केंद्र, - श्रीवर्धन (रायगड)
काजू संशोधन केंद्र, - वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
केळी संशोधन केंद्र, - यावल (जळगाव)
हळद संशोधन केंद्र, - डिग्रज (सांगली)
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, हिरज - केगांव (सोलापूर)
राष्ट्रीय कांदा- लसून संशोधन केंद्र - राजगुरूनगर (पुणे)
जगाविषयी सामान्य ज्ञान
* भारत जगातील सर्वात जास्त भाषा बोलणारा देश.
* भारत मोठय़ा संख्येत मतदार असणारा लोकशाही देश.
* भारत जगातील सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश.
* भारतात जगात सर्वाधिक पाऊस पडतो.
* श्रीलंकेत वर्षभर पाऊस पडतो.
* नेपाळ हे जगातील एकमेव हिंदू राष्ट्र आहे.
* जगात ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या सर्वात जास्त आहे.
* येशू ख्रिस्ताची जन्मभूमी बेथलहेम पॅलेस्टाईन देशात आहे.
* जेरुसलेम हे पवित्र शहर म्हणून प्रसिद्ध आहे.
* अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला.
* फिनलंड जगातील सर्वात जास्त सरोवरे असलेला देश.
* व्हॅटीकन सिटी सर्वात कमी प्रादेशिक क्षेत्र असलेले राष्ट्र.
* बर्मुडा ट्रँगल हे उत्तर अलटान्टिक महासागरातील भौगोलिक ठिकाण.
* इंग्लंडमध्ये जगातील पहिला तुरुंग (जेल) स्थापन केला.
* लंडनमध्ये सर्वात पहिली भुयारी रेल्वे सुरू.
* नॉर्वे हा जगातील सर्वाधिक कर असलेला देश.
* चीन हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश.
* स्वित्र्झलड हा जगातील सर्वात कमी बेकारी असणारा देश.
* केनिया हा जगातील सर्वाधिक जन्मदर असलेला देश.
* जपान भारताकडून लोह खनिज आयात करतो.
* रशियातील ट्रान्स सैबेरियन रेल्वे जगात सर्वाधिक लांबीची समजली जाते.
* नॉर्वे देशाला मध्यरात्रीचा सूर्य दिसतो.
* चीनमध्ये उन्हाळ्यात होणाऱ्या प्रचंड वादळांना टायफून म्हणतात.
* स्वीडन हा जगातील सर्वात जुने वृत्तपत्र अस्तित्वात असलेला देश.
* दमास्कस जगातील सर्वात प्राचीन शहर.
* टोकियो जगातील सर्वाधिक महागडे शहर.
* नेदरलँडमध्ये जगातील सर्वात जुना वायदेबाजार आहे.
* तुर्की देशाचे चलन सर्वप्रथम सुरू झालेला देश.
* हिरोशिमा शहरावर जगातील पहिला अणुबॉम्ब टाकण्यात आला.
* अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊस या नावाने ओळखतात.
* अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मेडल ऑफ फ्रीडम आहे.
* लंडनला लोकशाही संसदीय पद्धतीचा जनक म्हणतात.
* दक्षिण अमेरिकेतील निकाराग्वाने पूर्ण साक्षरतेचा टप्पा गाठला.
* मेक्सिकोमध्ये स्वाईन फ्ल्यूचा पहिला रुग्ण आढळला.
* दुबईतील बुर्ज दुबई या इमारतीला जगातील सर्वात उंच इमारतीचा किताब मिळाला.
* फिलिपाईन्सची मारिया कॉरिझॉन अकिनो ही आशियातील पहिली महिला राष्ट्राध्यक्ष आहे. नुकतेच कर्करोगाने निधन)
* बिजिंग (चीन) येथे जगातील सर्वात मोठे मत्स्यालय आहे.
* शिकागो येथे जगातील सर्वात मोठा कत्तलखाना आहे.
* फिलिपाईन्स देशाकडून रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात येतो.
* ल्हासा (तिबेट) जगातील सर्वात जास्त उंचीवरील विमानतळ. येथे बुद्धधर्मियांचे पवित्र र्थक्षेत्र. दलाई लामांचा प्रसिद्ध राजवाडा येथे आहे.
* बंकिंगहॅम पॅलेस इंग्लंडच्या राणीचे राहण्याचे ठिकाण.
* मक्का (सौदी अरेबिया) मुस्लीम धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र, मक्केच्या यात्रेवरून परत लेल्यांना हाजी ही उपाधी दिली जाते.
* पॅरिस येथे इंटरपोलचे मुख्यालय आहे.
* लंडन पोलिसांचे केंद्र कार्यालय स्कॉटलंड यार्ड या नावाने प्रसिद्ध आहे.
* चीन हा लष्करी शिक्षण सक्तीचे असलेला आशियाई देश आहे.
* बोट्सवाना हा जगातील स्वत:चे लष्कर नसलेला देश आहे.
* चीन हा जगातील सर्वात लांब भिंत असलेला देश आहे.
* कॅनडा सर्वात लांब रस्ते.
* जपान हा जहाजबांधणी व्यवसायात जगातील अग्रेसर देश.
* चीन हा मातीच्या भांडय़ांसाठी प्रसिद्ध असलेला देश आहे.
* कॅनडा हा वृत्तपत्र कागद निर्मितीत जगात अग्रेसर असलेला देश आहे.
* ब्राझील कॉफी उत्पादनात प्रथम.
* भारत चहा उत्पादनात प्रथम.
* बांगलादेश ताग उत्पादनात प्रथम.
* घाना कोकोच्या उत्पादनात प्रथम.
* अमेरिका मका उत्पादनात प्रथम.
* सौदी अरेबिया क्रूड तेल उत्पादनात प्रथम.
* क्युबा साखर निर्यात करणारा प्रमुख देश.
* चिली तांबे उत्पादनात प्रथम.
* मॅगनीज उत्पादनात रशिया प्रथम.
* कोळसा उत्पादनात रशिया अग्रेसर.
* अमेरिका जगातील सर्वात मोठा अॅल्युमिनियम उत्पादक देश.
* कांगो देशात युरेनियमचे सर्वात जास्त साठे आहेत.
* अमेरिका अणुऊर्जा निर्मितीत प्रथम
* ऑस्ट्रेलियात जगातील सर्वात मोठी हिमनदी आहे.
* अॅमेझॉन नदी विषुववृत्ताला दोन वेळा छेदून जाणारी नदी आहे.
* इटलीमध्ये जगातील सर्वात लहान नाव असलेली डी नदी आहे.
* चीनचे दु:खाश्रू हो-हॅग-हो नदीस म्हणतात.
* इंडोनेशिया जगातील ज्वालामुखींची सर्वात जास्त संख्या असलेला देश आहे.
* जपानमध्ये सर्वात जास्त भूकंप होतात.
* ग्रीनलंड जगातील सर्वात जास्त लांबीचे बेट.
* ब्राझीलमधील उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशाला कॅम्पोज म्हणतात.
* दक्षिण अमेरिकेतील वृक्षहीन गवताळ प्रदेशाला प्रेअरीज म्हणतात.
* इंग्लंडमधील प्रसिद्ध वृत्तपत्र द ऑब्झव्र्हर.
* रशियातील प्रसिद्ध वृत्तपत्र प्रवदा
* अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र द वॉशिंग्टन पोस्ट
* चीनमधील प्रसिद्ध वृत्तपत्र पीपल्स डेली
* भारतातील प्रसिद्ध वृत्तपत्र द इंडियन एक्स्प्रेस
* व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा कमिशनचे मुख्यालय आहे.
* ब्रुसेल्स (बेल्जियम) येथे युरोपियन एकॉनॉमी कम्युनिटीचे मुख्यालय आहे.
* मनिला (फिलिपाईन्स) येथे आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र आहे.
* हेग (हॉलंड) येथे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे.
* केप केनेडी (संयुक्त संस्थाने) नासाचे मुख्यालय.
* ऑक्सफर्ड इंग्लंडमधील सर्वात जुने विद्यापीठ.
* मोनॅको फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय जुगार अड्डय़ांचे केंद्र.
* अमेरिकेतील व्हेनिझुएला येथील एन्जल धबधबा जगातील सर्वात उंच धबधबा आहे.
* नेपाळ व तिबेटच्या सरहद्दीवर माऊंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे.
* आफ्रिकेतील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे.
* रोम शहराला सात टेकडय़ांचे शहर म्हणतात.
* थायलंडला पांढऱ्या हत्तीचा देश म्हणतात.
* मुंबई शहराला सात बेटांचे शहर म्हणतात.
* जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात.
* शिकागो शहराला उद्यानांचे शहर म्हणतात.
* इजिप्तला नाईलची देणगी म्हणतात.
* जगप्रसिद्ध पिरॅमिड नाईल नदीच्या काठी इजिप्तमध्ये आहे.
* इटलीमध्ये पिसा येथे सुप्रसिद्ध झुकता मनोरा आहे.
* भारतातील आग्रा येथे मोगल सम्राट शहाजहान याने आपली पत्नी मुमताज हिच्या स्मृत्यर्थ
जगप्रसिद्ध ताजमहाल ही वास्तू बांधली.
गणित : महत्त्वाची सूत्रे
मूळ संख्या- फक्त त्याच संख्येने किंवा १ नेपूर्ण भाग जाणारी संख्या,
सम संख्या - २ ने पूर्ण भाग जाणारी संख्या,
विषम संख्या - २ ने भाग न जाणारी संख्या,
जोडमूळ संख्या- ज्या दोन मूळ संख्यांत केवळ२ चा फरक असतो,
संयुक्त संख्या - मूळसंख्या नसलेल्या नैसर्गिकसंख्या.
संख्यांचे प्राथमिक क्रियाविषयक नियम
A)समसंख्या + समसंख्या= समसंख्या.
B)समसंख्या - समसंख्या= समसंख्या.
C)विषमसंख्या - विषमसंख्या = समसंख्या.
D)विषमसंख्या + विषमसंख्या= समसंख्या
E)समसंख्या × समसंख्या = समसंख्या.
F)समसंख्या × विषम संख्या = समसंख्या.
G)विषमसंख्या × विषमसंख्या= विषमसंख्या.
एक अंकी एकूण संख्या ९ आहेत तर दोन अंकी ९०,तीन अंकी ९०० आणि चार अंकी एकूण संख्या ९००० आहेत.
० ते १०० पर्यंतच्या संख्यांत-
।) २ पासून ९ पर्यंतचेअंक प्रत्येकी २० वेळा येतात.
।।) १ हा अंक २१ वेळा येतो.
।।।) ० हा अंक ११ वेळा येतो.
१ ते १०० पर्यंतच्या संख्यांत-
।) २ पासून ९ पर्यंतचे अंक असलेल्या एकूणसंख्या प्रत्येकी १९ येतात.
।।) दोन अंकी संख्यात १ ते ९ या अंकांच्याप्रत्येकी १८ संख्या असतात.
दोन अंकांमधून एकूण २ संख्या,तीन अंकांमधून एकूण ६ संख्या,चार अंकांमधून एकूण २४ संख्या व पाच अंकांमधून एकूण १२० संख्या तयार होतात.
विभाज्यतेच्या कसोटय़ा
A)२ ने नि:शेष भाग जाणारी संख्या -संख्येच्या एककस्थानी ०, २, ४, ६, ८ यापैकीकोणताही अंक असल्यास.
B)३ ची कसोटी-संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला ३ ने नि:शेषभाग जात असल्यास.
C)४ ची कसोटी-संख्येच्या शेवटच्या २ अंकांनी तयार होणाऱ्यासंख्येला ४ ने नि:शेष भाग जात असल्यासअथवा संख्येच्या शेवटी कमीतकमी दोन शून्यअसल्यास.
D)५ ची कसोटी-संख्येच्या एकक स्थानचा अंक जर ० किंवा ५असल्यास.
E)६ ची कसोटी-ज्या संख्येला २ व ३ या अंकांनी नि:शेष भागजातो त्या संख्यांना ६ ने नि:शेष भाग जातोचकिंवा ज्या सम संख्येच्या अंकांच्या बेरजेला ३ने भाग जातो त्या संख्येला ६ ने निश्चित भाग जातो.
F)७ ची कसोटी-संख्येतील शेवटच्या ३ अंकांनी तयारहोणाऱ्या संख्येतून डावीकडील उरलेल्याअंकांनी तयार झालेली संख्या वजा करूनआलेल्या संख्येस ७ ने नि:शेष भाग गेल्यास त्यासंख्येला ७ ने नि:शेष भाग जातो.
G)८ ची कसोटी-संख्येतील शेवटच्या तीन अंकांनीतयार होणाऱ्या संख्येला ८ ने निशेषभाग जातअसल्यास किंवा संख्येत शेवटी कमीतकमी ३शून्य असल्यास त्या संख्येला ८ ने निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या शतकस्थानी २ हा अंकअसतो व जिच्या अखेरच्या दोन अंकी संख्येला ८ने भाग जातो त्या संख्येला ८ ने भाग जातो.
H)९ ची कसोटी-संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला९ ने निशेषभाग जातो.
I)११ ची कसोटी-ज्या संख्येच्या विषम स्थानच्याया समस्थानच्या अंकांची बेरीज अथवा ११च्यापटीत असल्यास त्या संख्येला ११ ने निशेष भागजातो. एक सोडून १ अंकांची बेरीज समान असते किंवा फरक ० किंवा ११ च्या पटीत असतो.
J)१२ ची कसोटी-ज्या संख्येला ३ व ४या अंकांनी निशेष भाग जातो त्या संख्येला १२ ने भाग जातो.
K)१५ ची कसोटी-ज्या संख्येला ३ व ५ अंकानी निशेष भाग जातोत्या संख्येला १५ ने भाग जातो.
L)३६ ची कसोटी-ज्या संख्येला ९ व ४ ने निशेष भाग जातो त्या संख्येला ३६ ने भाग जातो.
M)७२ ची कसोटी-ज्या संख्येला ९ व ८ ने निशेषभाग जातो त्या संख्येला ७२ ने भाग जातो.
लसावि - लघुत्तम सामाईक विभाज्य संख्या:
दिलेल्या संख्यांनी ज्या लहानात लहानसंख्येला पूर्ण भाग जातो ती संख्या
मसावि - महत्तम सामाईक विभाजक संख्या:
दिलेल्या संख्यांना ज्या मोठय़ात मोठय़ा संख्येने(विभाजकाने) भाग जातो ती संख्या
प्रमाण भागिदारी
A)नफ्यांचे गुणोत्तर= भांडवलांचे गुणोत्तर ×मुदतीचे गुणोत्तर,
B)भांडवलांचे गुणोत्तर= नफ्यांचे गुणोत्तर+मुदतीचे गुणोत्तर,
C)मुदतीचे गुणोत्तर = नफ्यांचे गुणोत्तर ÷ भांडवलाचे गुणोत्तर.
गाडीचा वेग-वेळ-अंतर
A) खांब ओलांडण्यास गाडीला लागणारा वेळ =गाडीची लांबी ÷ ताशी वेग × १८/५
B) पूल ओलांडताना गाडीला लागणारा वेळ =गाडीची लांबी + पुलाची लांबी ÷ताशी वेग × १८/५
C) गाडीचा ताशी वेग=कापावयाचे एकूण अंतर ÷ लागणारा वेळ ×१८/५
D) गाडीची लांबी=ताशी वेग × खांब ओलांडताना लागणारावेळ × ५/१८
E) गाडीची लांबी + पुलाची लांबी = ताशी वेग× पूल ओलांडताना लागणारा वेळ + ५/१८
F) गाडीचा ताशी वेग व लागणारा वेळ काढताना १८/५ ने गुणा व अंतर काढताना ५/१८ ने गुणा
G) पाण्याच्या प्रवाहाचा ताशी वेग=नावेचा प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग - प्रवाहाच्याविरुद्ध दिशेने ताशी वेग ÷ २
सरासरी
A) X संख्यांची सरासरी= दिलेल्या संख्येची बेरीजभागिले X
B) क्रमश:संख्याची सरासरी ही मधली संख्या असते.
C) X संख्यामान दिल्यावर ठराविक संख्यांची सरासरी =(पहिली संख्या+शेवटची संख्या) ÷ X
D) X या क्रमश: संख्याची बेरीज =(पहिली संख्या + शेवटची संख्या) ×X÷ २
सरळव्याज
A)सरळव्याज=मुद्दल × व्याजदर × मुदत ÷१००
B)मुद्दल=सरळव्याज × १०० ÷ व्याजदर × मुदत
C)व्याजदर =सरळव्याज × १०० ÷ मुद्दल × मुदत
D)मुदत वर्षे=सरळव्याज×१००÷ मुद्दल×व्याजदर=>
नफा-तोटा
A)नफा =विक्री- खरेदी,
B)विक्री = खरेदी + नफा,
C)खरेदी = विक्री+ तोटा,
D)तोटा = खरेदी - विक्री
E)शेकडा नफा=प्रत्यक्ष नफा × १००÷ खरेदी
F)शेकडा तोटा = प्रत्यक्ष तोटा × १०० ÷खरेदी
G)विक्रीची किंमत = खरेदीची किंमत×(१००+शेकडा नफा) ÷१००
H)खरेदीची किंमत =(विक्रीची किंमत ×१००)÷(१००+ शेकडा नफा)
भारतीय संविधानातील महत्वाच्या घटना दुरूस्त्या
*१ली दुरुस्ती जून १८
१९५१ भूसम्पत्तिविषयक राज्य
विधानसभांच्या कायद्यास
वैधता दिली गेली.
*२री दुरुस्ती मे १ १९५३ संसदेत
राज्यांच्या प्रतिनिधीत्वाविषयी बदल
लागू
*३री दुरुस्ती फेब्रुवारी २२
१९५५ राज्य, केंद्र व जोडसूचीत दुरुस्ती
*४थी दुरुस्ती एप्रिल २७
१९५५ जमिन अधिग्रहणाबाबत
नुकसानभरपाई
न्यायालयांच्या परिघाबाहेर
*५वी दुरुस्ती २४ डिसेम्वर
१९५५ राज्य
पुनर्गठनाविषयी राज्यांची मतमतांतरे
जाणून
घेण्यासाठीची समयसीमा निर्धारित
केली गेली.
*६वी दुरुस्ती सप्टेंबर ११
१९५६ व्यापारी मालांवरच्या करांमध्ये
बदल घडवणारी संविधानाच्या कलम २६९
व
२८६ क्रं ची दुरुस्ती.
*७वी दुरुस्ती नोव्हेंबर १
१९५६ राज्य
पुनरचनेचा विषयीचा सरकारी निर्णय
लागू.
*८वी दुरुस्ती जानेवारी ५
१९६० अनुसूचित जाती व जमाती; अँग्लो-
इन्डियन समाजासाठीची आरक्षण
व्यवस्थेची मर्यादा १० वर्षांऐवजी २०
वर्षे केली.
*९वी दुरुस्ती डिसेंबर २८
१९६० शेतीघरे
हस्तान्तरांविषयीचा भारत-
पाकिस्तान करार अमलात
आणण्यासाठीची दुरुस्ती.
*१०वी दुरुस्ती ऑगस्ट ११
१९६१ पूर्वीच्या पोर्तुगिज
वसाहती असलेल्या
दादरा, नगर व हवेली यांना केंद्रशासित
प्रदेशाचा दर्जा
*११वी दुरुस्ती डिसेंबर १९
१९६१ राष्ट्रपती व
उपराष्ट्रपती यांच्या निवडणूकीतील
वैधतेसाठी निवडणूक प्रक्रिया संदेहरहित
होण्यासाठीची दुरुस्ती.
*१२वी दुरुस्ती डिसेंबर २०
१९६१ २४० क्रं कलमात व
पहिल्या परिशिष्टात दुरूस्ती करून
गोवा, दमन व दीव यांना केंद्रशासित
प्रदेशाचा दर्जा.
*१३वी दुरुस्ती डिसेंबर १
१९६३ नागालँडच्या प्रशासन व्यवस्थेत
राज्यपालांना विशेष आधिकार देण्यात
आले.
*१४वी दुरुस्ती डिसेंबर २८
१९६२ फ्रान्सच्या ताब्यातून भारतात
विलिन झालेल्या पाँडिचेरीस केंद्रशासित
प्रदेशाचा दर्जा.
*१५वी दुरुस्ती ऑक्टोबर ५
१९६३ संविधानाच्या १२४, १२८,
२१७, २२२,
२२५-क, २२६, २९७ व ३११ कलमांमध्ये
दुरुस्ती.
*१६वी दुरुस्ती ऑक्टोबर ५
१९६३ संविधानाच्या १९ नं कलमात
‘भारताचे सार्वभौमत्व व अखण्डतेसाठी’
पुरेसे
आधिकार उपलब्ध केले गेले. याशिवाय ८४ व
१७३ नं कलमात दुरुस्ती करून राज्य
विधानसभा व संसदीय उमेदवारांस
भारताचे सार्वभौमत्व व
अखण्डता रक्षणाची शपथ
सक्तीची केली गेली.
*१७वी दुरुस्ती जून २० इ.स.
१९६४ संपत्तीच्या आधिकाराविषयीच्या
दुरूस्त्या
*१८वी दुरुस्ती २७ अगस्ट
१९६६ केंद्रशासित प्रदेशांची नावे व
सीमा बदलण्याचे आधिकार संसदेस दिले गेले.
*१९वी दुरुस्ती डिसेंबर ११
१९६६ निवडणूक लवादाऐवजी उच्च
न्यायालयास संसद वा राज्य
विधानसभांविषयीच्या याचिका दाखल
करून घेण्याचे आधिकार दिले गेले.
*२०वी दुरुस्ती डिसेंबर २२
१९६६ जिल्हा शासंकांच्या निर्णयास
वैधता दिली गेली.
*२१वी दुरुस्ती एप्रिल १०
इ.स. १९६७ सिंधी भाषेस
सहाव्या परिशिष्टाद्वारे
आधिकृत भाषेचा दर्जा.
*२२वी दुरुस्ती सप्टेंबर २५
इ.स. १९६९ आसामची पुनररचना
*२३वी दुरुस्ती जानेवारी २३
इ.स. १९७० लोकसभा व राज्य
विधानसभेत अनुसूचित
जातीजमाती व अँग्लो-इन्डियन
समाजासाठीची आरक्षण
व्यवस्थेची मर्यादा इ.स. १९७९
सालच्या जानेवारी महिन्यापर्यंत
वाढवली.
*२७वी दुरुस्ती फेब्रुवारी १५
इ.स. १९७२
*२८वी दुरुस्ती ऑगस्ट २९
इ.स. १९७२ भारतीय सनदी सेवांतर्गत
नियुक्त
कर्मचा-यांच्या विशेष सोईसुविधा रद्द
*२९वी दुरुस्ती जून ९ इ.स.
१९७२ केरळ
राज्याच्या जमिनसुधारणा नवव्या
परिशिष्टात समाविष्ट.
*३१वी दुरुस्ती ऑक्टोबर १७
इ.स. १९७३ लोकसभा सदस्यसंख्या ५२५
पासून
वाढवून ५४५ केली गेली.
*३२वी दुरुस्ती जुलै १ इ.स.
१९७४ आंध्र प्रदेश राज्यासाठी विशेष
सांविधानिक व्यवस्था.
*३५वी दुरुस्ती मार्च १ इ.स.
१९७५ सिक्किम भारताचे सहयोगी राज्य
*३६वी दुरुस्ती एप्रिल २६
इ.स. १९७५ सिक्किम राज्यास
पूर्णराज्याचा दर्जा
*४२वी दुरुस्ती वा छोटे
संविधान जानेवारी ३
इ.स. १९७७
Saturday, June 24, 2017
मराठी महत्वाची अशी निवडक ३२५ सामान्य ज्ञान प्रश्नावली
Q1. बल्लारपूर कागद गिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे? -चंद्रपूर
Q2. राज्यातील पहिले कायम स्वरूपी बालन्यायालय खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे? - नाशिक
Q3. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Q4. खालील पैकी कोणते शहर महाराष्ट्राचा 'हरित पट्टा' म्हणून ओळखले जाते - नाशिक
Q5. 2011 ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची कितवी जनगणना होती? - 7 वी
Q6. राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ खालील पैकी कोणत्या शहरात आहे? - धुळे
Q7. मोबाईल तंत्र ज्ञानात नेहमी उल्लेख होत असलेल्या जी .एस.एम. (GSM) मधील 'एस' म्हणजे__ - System
Q8. आदिवासी वन संरक्षण कायदा कोणत्या साली पारित झाला? - 2004
Q9. बाभळी प्रकल्प कोणत्या दोन राज्यामधील वादाचा मुद्दा बनला? - महाराष्ट्र - आंध्रप्रदेश
Q10. मुंबई पुणे द्रुतगती मार्गास (Express Way) कोणाचे नाव देण्यात आले आहे? - यशवंतराव चव्हाण
Q11. 'Planned Economy for India' (भारतासाठी नियोजीत अर्थव्यवस्था) हा ग्रंथ कोणी लिहीला? - एम. विश्वेश्वरैय्या
Q12. Q12. ASEAN ची 21वी शिखर परिषद नुकतीच कोणत्या देशात पार पडली? - कंबोडिया
Q13. अमेरिकेत स्थापन्यात आलेल्या कोणत्या गुरुद्वारास नुकतीच १०० वर्षे पूर्ण झालीत? - स्टोकटोन गुरुद्वारा साहिब
Q14. खालील पैकी कोणत्या राज्यातील एका दलित वस्तीस नुकतेच म्यानमार च्या नेत्या आन सान्ग स्यू की ह्यांचे नाव देण्यात आले आहे? - आंध्र प्रदेश
Q15. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुकतेच पाकिस्तान भेटीदरम्यान तक्षिला या प्राचीन शहरास भेट दिली, तक्षिला पाकिस्तानातील कोणत्या प्रांतात आहे? - पंजाब
Q16. नुकतेच कोणत्या देशातील संसदेने १९८४ सालच्या शीख विरोधी दंग्यांना "जाती संहार" (Genocide) म्हणून निवेदन जारी केले आहे? - ऑस्ट्रेलिया
Q17. 2 ते 6 जानेवारी 2013 ह्या कालावधीत कोची (केरळ) येथे झालेल्या प्रवासी भारतीय दिवसाचे मुख्य अतिथी कोण? - राजकेश्वर पुरयाग (Mauritius)
Q18. डिसेंबर २०१२ मध्ये आयोजित बारामती (जिल्हा: पुणे) येथे होणार्या नाटय़संमेलनाचे अध्यक्षस्थान कोण भूषविणार आहे? - डॉ. मोहन आगाशे
Q19. World Economic Forum ने जारी केलेल्या आर्थिक विकास सूची मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? - 40वा
Q20. 2012 चा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार कोणास मिळाला आहे? - गुलजार
Q21. 2011 च्या जनगणने नुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता? - नंदुरबार
Q22. 2011 च्या जनगणने नुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक स्त्री साक्षरतेचा जिल्हा कोणता आहे? -मुंबई उपनगरे
Q23. ११व्या योजनेत सर्वाधिक खर्चाच्या पहिल्या ३ क्षेत्रांचा उतरता क्रम लावा.
अ. ऊर्जा ब. सामाजिक सेवा क. वाहतूक
- ब. अ. क.
Q24. केंद्रीय नियोजन मंडळ खालील पैकी कोणाच्या अधिनस्थ कार्य करते? - पंतप्रधान कार्यालय
Q25. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत खालील पैकी कशात घट झाली नाही? - किमतींचा निर्देशांक
Q26. महाराष्ट्रात जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? - पालक मंत्री
Q27. 1936 मध्ये 'नियोजन करा अन्यथा नष्ट व्हा' असा संदेश कोणी दिला? - एम. विश्वेश्वरैय्या
Q28. पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरु करण्यात आले? - भाक्रा- नांगल प्रकल्प, सिंध्री खत कारखाना, Hindustan Antibiotics, पिंप्री
Q29. भारतात सेवा कर लागू करण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली? - 88 वी
Q30. घटनेत बजेटला काय म्हणून संबोधण्यात आले आहे? - वार्षिक वित्तीय विवरण पत्र
Q31. महाराष्ट्रात कोणत्या पिकाकरिता 'इक्रिसॅट' (Icrisat) तंत्र अवलंबिले जाते? - भुईमूग
Q32. खालीलपैकी कोणती एक रबी ज्वारीची जात शेती संशोधन केंद्र, मोहोळ येथून निर्माण झाली आहे? - मालदांडी -35-1
Q33. भारतात हरित क्रांती कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली? - 1966 - 67
Q34. देशातील पहिले भारतरत्न पुरस्कार विजेते मुख्यमंत्री कोण? - गोविंद वल्लभ पंत (1957)
Q35. खालीलपैकी कोणते एक पीक लागवडीसाठी महाराष्ट्रात सर्व हंगामात घेतले जाते? - सूर्यफूल
Q36. 2011 चा 'साहीत्य अकादमी ' चा पुरस्कार कवी ग्रेस यांना कोणत्या साहित्य निर्मितीसाठी बहाल करण्यात आला? - वार्याने हालते रान
Q37. कोणत्या वर्षाला भारतीय लोकसंख्या इतिहासातील 'महाविभाजन वर्ष' म्हणतात? - 1921
Q38. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात स्त्री-पुरुष प्रमाण किती आहे? - 925
Q39. पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामांतर ___ असे करण्यात आले. - रायगड
Q40. "स्त्री व पुरुष दोहोंना समान कामाचे समान वेतन" हे तत्त्व भारतीय राज्यघटनेत कुठे आढळते? - मार्गदर्शक तत्त्वे
Q41. ठक्कर बाप्पा यांनी __ या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे? - आदिवासी कल्याण
Q42. आगरकरांनी १५ ऑक्टोबर १८८८ रोजी सुरु केलेल्या 'सुधारक' या साप्ताहिकाचे पहिले संपादक कोण होते (English Edition)? - गो. कृ. गोखले
Q43. __ यांनी रत्नागिरी येथे 'पतित पावन मंदिर' बांधले. - स्वातंत्र्यवीर सावरकर
Q44. अमरावती येथे सन १९३२ मध्ये 'श्री शिवाजी शिक्षण संस्थे'ची स्थापना कोणी केली? - डॉ. पंजाबराव देशमुख
Q45. __ हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे १८९१ मध्ये प्रकाशित झाला. - सार्वजनिक सत्यधर्म
Q46. खालील पैकी कोणास 'काळकर्ते परांजपे' म्हणून ओळखले जाते? - रघुनाथराव परांजपे
Q47. "आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील " हा निबंध __ यांनी लिहिला. - गोपाळ गणेश आगरकर
Q48. खालील पैकी कोणी 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी' चे अध्यक्ष पद भूषविले होते? - शाहू महाराज
Q49. 'सब भूमी गोपाल की' व 'जय जगत' या घोषणांचे व त्यामागील विचार धारेचे श्रेय __ यांना जाते. - विनोबा भावे
Q50. 'भारतीय सामाजिक परिषदे' च्या स्थापनेचे श्रेय न्यायमूर्ती रानडे यांना जाते, कोणत्या वर्षी या परिषदेची स्थापना करण्यात आली? - 1887
Q51. संगीत कला केंद्राच्या वतीने दिला जाणारा 'आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार' या वर्षी कोणाला जाहीर झाला आहे? - यमुनाबाई वाईकर
Q52. खालील पैकी कोणता व्हिडीओ नुकताच यु-ट्यूब वरील सर्वाधिक लोकप्रिय व्हिडिओ ठरला आहे? (more than 80crore views) - गैंगनाम स्टाइल
Q53. शालेय स्तरावर संगणकामार्फत शिक्षण देण्याच्या हेतूने खालील पैकी कोणती योजना सुरु करण्यात आली? - विद्यावाहीनी
Q54. भारताचे पहिले विज्ञान धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले? - 1958
Q55. ' Y2K ' ही संगणक क्षेत्रातील समस्या कोणत्या वर्षाशी संबंधित होती? - 2000
Q56. I.T. ही शाखा म्हणजे __ - Information Communication Technology
Q57. IBM ह्या कंपनीच्या Artificial Technology वर आधारित ___या Chess Program ने garry kasparov या बुद्धिबळ पटूस मात दिली होती. - Deep Blue
Q58. इंदिरा पॉइंट काय आहे? - भारताचे दक्षिण टोक
Q59. 127.0.0.1 ह्या I.P Address ला ____ I.P Address म्हणतात. - Loop Back
Q60. Java Script हे product या कंपनीचे आहे. - Net Scape
Q61. कोणी १९०१ साली बोलपूर मध्ये 'शांतीनिकेतन' ची स्थापना केली? - रवींद्र नाथ टागोर
Q62. 'राष्ट्रासभे' ची स्थापना झाली तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते? - लॉर्ड डफरीन
Q63. खालील पैकी कोण 'राष्ट्रसभे' च्या पहिल्या अधिवेशनास हजर नव्हते? - महात्मा गांधी
Q64. भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते? - जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर
Q65. 'वंदे मातरम' हे वृत्तपत्र अरविंद घोष चालवीत होते, तर त्यांचे बंधू बारीन्द्र घोष __ हे वृत्तपत्र चालवीत. - युगांतर
Q66. १९१९ साली भरलेल्या अखिल भारतीय खिलापत चळवळीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती? - महात्मा गांधी
Q67. खालील पैकी कोणी देशी वृत्तपत्र कायदा संमत करून भारतीयांचा रोष ओढवून घेतला होता? - लॉर्ड लिटन
Q68. आपण समाजवादी असल्याचे कॉंग्रेस च्या कोणत्या अध्यक्षाने स्पष्टपणे जाहीर केले होते? - पंडित नेहरू
Q69. आंध्र राज्य हे भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणत्या साली अस्तित्वात आले? - 1953
Q70. चीन ने भारतावर हल्ला केला, त्यावेळी भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? - व्ही. के. कृष्ण मेनन
Q71. कोणत्या खेळात भारताने पहिले कॉमनवेल्थ पदक मिळवले? - रेसलिंग (wrestling)
Q72. धारा ३७१ कोणत्या दोन भारतीय राज्यांच्या विशेष व्यवस्थेशी संबंधित आहे ? - महाराष्ट्र व गुजरात
Q73. मिठाचा कायदा मोडून महात्मा गांधीजींनी सुरू केलेली चळवळ? - सविनय कायदेभंग चळवळ
Q74. खालील पैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे? (By Length) - NH7
Q75. कला व कलेचा प्रचार करण्यासाठी १९५४ मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली गेली होती? - ललित कला अकादमी
Q76. फार्मूला वन फोर्स इंडिया संघाचे मालक कोण आहे?
- विजय मल्ला
Q77. YCMOU ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? - 1989
Q78. धर्म, जात, वंशाचा भेदभाव न करता कोणत्या भारतीय राज्यात कुटुंबाशी संबंधीत पोर्तुगाली आचार संहितेवर आधारित कायदे अमलात आणले जातात? - गोवा
Q79. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासन कोणती योजना राबवित आहे? - सुकन्या
Q80. नवी दिल्ली येथील ऐजाबाद बाग सध्या कोणत्या नावाने ओळखली जाते? - शालीमार गार्डन
Q81. या पैकी कोणत्या बेटाचे नाव स्पॅनिश भाषेतील जमीनीवर आढळणार्या कासवांच्या नावावरून ठेवले गेले होते? - गेलापॅगोस
Q82. कॉम्प्यूटरमध्ये वापरल्या जाणार्या संचार नियमांना काय म्हटले जाते? - प्रोटोकॉल
Q83. हिमाचल प्रदेशात कोणता सण देशातील इतर स्थानांपेक्षा तीन दिवस नंतर साजरा केला जातो? - दसरा
Q84. 2001 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूला संयुक्त राष्ट्र शांतिदूत नियुक्त केले गेले होते? - विजय अमृतराज
Q85. पूर्वी घाटातील सर्वोच्च शिखर अर्मा कोंडा कोणत्या भारतीय राज्यात आहे? - आंध्र प्रदेश
Q86. भारतातील त्रिभुज प्रदेश तयार न होणारी नदी कोणती? - नर्मदा
Q87. जीआयएफ (GIF) चा विस्तार काय आहे? - ग्राफिक्स इंटरचेंज फॉरमॅट
Q88. हिमरू कला भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? - कर्नाटक
Q89. कोणते भारतीय नृत्य 'सादिर नाच' (Sadir Dance) या नावाने प्रसिद्ध होते? - भरतनाट्यम
Q90. बौद्ध मठांसाठी प्रसिद्ध असलेले स्थान तवांग हे कोणत्या राज्यात आहे? - अरुणाचल प्रदेश
Q91. खालील पैकी कोणत्या राज्याने 1 ऑगस्ट 2012 नंतर निवृत्ती वेतनास पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी 'ई-पेन्शन' पद्धती कार्यान्वित केली? - हरियाणा
Q92. कोणत्या राज्याने अलीकडेच 25 ते 40 वर्षे वयो गटातील आणि वार्षिक 36 हजार रुपये पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील बेरोजगारां साठी दरमहा 1000 रुपये बेरोजगार भत्ता सुरु केला? - उत्तरप्रदेश
Q93. राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना कोणता पुरस्कार देण्यात येतो? - अहिल्याबाई होळकर
Q94. महाराष्ट्रातील _____ जिल्ह्यातील मेंढालेखा या गावात लोक सहभागातून जंगल व्यवस्थापन व संवर्धनाचे काम केले जाते. - गडचिरोली
Q95. भोपाळ वायुदुर्घटना ______या वर्षी घडली होती. - 1984
Q96. Blue Print for Survival हे पर्यावरण विषयी पुस्तक _____ यांनी लिहिले आहे. - सरला बेन
Q97. जागतिक जैवविविधता संवर्धन दिन केव्हा साजरा केला जातो? - 24 नोव्हेंबर
Q98. 'ज्ञानवाणी' हा प्रकल्प कोणत्या संस्थेचा आहे? - इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ
Q99. गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे? - वैनगंगा
Q100. राजीव गांधी जीवनदायी योजना राज्यात केव्हा सुरु करण्यात आली? - 2 जुलै 2012
वैज्ञानिक व त्यांचे शोध
विमान - राईट बंधू
डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल
रडार - टेलर व यंग
रेडिओ - जी. मार्कोनी
वाफेचे इंजिन - जेम्स वॅट
थर्मामीटर - गॅलिलीयो
हेलीकॉप्टर - सिकोर्स्की
विजेचा दिवा - एडिसन
रेफ्रीजरेटर - पार्किन्स
सापेक्षतेचा सिद्धांत - आइनस्टाइन
सायकल - मॅकमिलन
डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल
रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी
टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल
ग्रामोफोन - एडिसन
टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड
पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग
उत्क्रांतिवाद - डार्विन
भूमिती - युक्लीड
देवीची लस - जेन्नर
अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस
अँटी रेबीज - लुई पाश्चर
इलेक्ट्रोन – थॉमसन
हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश
न्यूट्रोन – चॅडविक
आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर
विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे
कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल
गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन
Friday, June 23, 2017
भारतीय रेल्वेज्ञान
*भारतीय रेल्वे १६१ वर्षांंपूर्वी सुरू झाली.
पहिली प्रवासी गाडी मुंबई ते ठाणे ३३
किमी धावली. तिला चौदा डबे होते व
त्यात ४०० पाहुणे होते. ती बोरीबंदरहून
दुपारी साडेतीनला सुटली,
त्यादिवशी सार्वजनिक सुटी देण्यात
आली होती.
*रेल्वेचे राष्ट्रीयीकरण १९५१ मध्ये करण्यात आले,
त्यात आशियामध्ये भारतीय
रेल्वेची यंत्रणा मोठी असून जगातील
दुसरी मोठी रेल्वे यंत्रणा आहे. एकूण ११५०००
किमी लांबीचे रेल्वेमार्ग आहेत व एकूण १२६१७
गाडय़ा २३ दशलक्ष प्रवाशांची रोज वाहतूक
करतात.म्हणजे एकूण
ऑस्ट्रेलियाएवढय़ा लोकसंख्येइतके
प्रवासी रोज रेल्वेने प्रवास करतात. एकण ७१७१
रेल्वे स्थानके आहेत.
*रोज ७४२१ मालगाडय़ा ३० लाख टन माल
वाहून नेतात. चीन, रशिया व
अमेरिका वार्षिक १० अब्ज टन
मालाची वाहतूक करतात त्यांच्या रांगेत
आपणही आहोत. एकूण २३९२८१ मालडबे असून
५९७१३ प्रवासी डबे व ९५४९ इंजिने आहेत.
*१९२०-२१ मध्ये अॅकवर्थ समितीने प्रथम रेल्वे
अर्थसंकल्प मांडण्याची कल्पना मांडली.
विल्यम अकवर्थ हे ब्रिटिश अर्थतज्ज्ञ होते.
केंद्रीय अर्थसंकल्पापासून रेल्वे अर्थसंकल्प १९२४
मध्ये वेगळा काढण्यात आला.
*स्वातंत्र्योत्तर काळात रेल्वेने ७५ टक्के
सार्वजनिक वाहतूक, ९० टक्के मालवाहतूक इतके
प्रमाण गाठले आहे. त्यामुळे स्वतंत्र अर्थसंकल्प
आवश्यक झाला.
*२४ मार्च १९९४ रोजी लालूप्रसाद यादव रेल्वे
मंत्री असताना रेल्वे अर्थसंकल्पाचे प्रथम थेट
प्रक्षेपण करण्यात आले. ते २००४ ते २००९ पर्यंत
रेल्वेमंत्री होते. त्यांनी लागोपाठ सहा रेल्वे
अर्थसंकल्प सादर केले होते.
*रेल्वे अर्थसंकल्प सादर
करणाऱ्या पहिल्या महिला रेल्वे
मंत्री ममता बॅनर्जी आहेत व त्यांनी २००० व
२००२ मध्ये रेल्वे अर्थसंकल्प सादर केला होता.
एनडीए व यूपीए या दोन्ही सरकारांचे
अर्थसंकल्प त्यांनी सादर केले
एनडीए व यूपीए या दोन्ही सरकारांचे
अर्थसंकल्प त्यांनी सादर केले होते.
*भारताची सर्वात वेगवान गाडी ताशी १६०
किमी वेगाची आहे.
दिल्ली-आग्रा प्रवास आता निम्न वेगवान
गाडय़ांमुळे १ तासाचा होईल, आता तो ९०
मिनिटांचा आहे.
*नवी दिल्ली-भोपाळ शताब्दी ही सर्वात
वेगाने जाणारी गाडी असून तिचा वेग
फरिदाबाद-आग्रा भागात ताशी दीडशे
किलोमीटर आहे. मेतुपालयम-
उटी निलगिरी गाडी ताशी दहा कि.मी.
वेगाने धावते व ती सर्वात कमी वेगाने
जाणारी गाडी आहे.
*नवी दिल्ली रेल्वे स्टेशनला जगातील सर्वात
मोठे ‘रूट रिले इंटरलॉकिंग सिस्टीम’
साठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये मान
मिळाला आहे. अगदी जास्त
वाहतुकीच्या काळातही गाडय़ा वळवणे
त्यामुळे शक्य होते.
*रेल्वेमध्ये १.४ दशलक्ष कामगार असून जगातील
सातवा मोठा नियोक्ता म्हणून रेल्वेकडे
बघितले जाते.
*उत्तर प्रदेशातील गोरखपूर रेल्वे
स्टेशनच्या प्लॅटफॉर्मचे नूतनीकरण करण्यात आले
असून तो सर्वात लांब म्हणजे १३६६ मीटरचा आहे.
पश्चिम बंगालमधील खरगपूर येथे १०७२ मीटर
लांबीचा प्लॅटफॉर्म आहे. शिकागोत सेंटर सबले
स्टेशन १०६७ मीटरचे आहे.
*रेल्वेने आतापर्यंत जगात सर्वाधिक रेल्वे पूल
बांधले असून त्यांची एकूण उंची कुतुब
मिनारपेक्षा पाच पट जास्त व आयफेल टॉवर
पेक्षा ३५ मीटर जास्त भरेल.
*भारतीय रेल्वेत काश्मीर खोऱ्यात जम्मूतील
बनिहाल नजीक पीर पांजाल बोगदा सर्वात
मोठा असून तो ११.२ कि.मी लांबीचा आहे.
जास्त मोठा मार्ग असलेली रेल्वे ‘विवेक
एक्सप्रेस’ असून ती दिब्रुगड -
कन्याकुमारी दरम्यान धावते व ४२८६ कि.मी.
अंतर ८२ तास व ३० मिनिटात तोडते.
*भारतीय रेल्वेत प्रसाधनगृहे १९०९ मध्ये आली.
१९८६ मध्ये रेल्वे जागांचे संगणकीकरण करण्यात
आले.
*सर्वात संक्षिप्त नावाचे स्टेशन ओडिशातील
‘आयबी’ हे आहे तर सर्वात मोठय़ा नावाचे
स्टेशन ‘वेंकटनरसिहराजुवरीपेटा’ हे २९
अक्षरी नावाचे आहे.
*भारतीय रेल्वेची चार ठिकाणे
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आहेत.
त्यात दार्जिलिंग, हिमालयन रेल्वेचा १९९९
मध्ये समावेश झाला. मुंबई सीएसटी इमारत असे
नामकरण २००४ मध्ये झाले. नीलगिरी रेल्वेज हे
नाव २००५ मध्ये देण्यात आले. काल्का-
शिमला रेल्वे हे नाव २००८ मध्ये देण्यात आले.
*नवी दिल्ली व राजस्थानमधील अल्वर
दरम्यान ‘द फेअरी क्वीन’ ही गाडी धावते.
ती जगातील सर्वात जुनी वाफेवर
चालणारी गाडी आहे. तिची नोंद गिनीज
बुकात झाली असून
तिला वारसा पुरस्कारही मिळाला आहे.
*रेल्वेचे दक्षिण, मध्य, पश्चिम, पूर्व, उत्तर, ईशान्य,
आग्नेय, ईशान्य फ्रंटियर, दक्षिण मध्य,
कोलकाता मेट्रो, पूर्व मध्य, उत्तर पश्चिम, पूर्व
किनारा, उत्तर मध्य, दक्षिण-पूर्व -मध्य,
दक्षिण पश्चिम, पश्चिम मध्य असे विभाग आहेत.
*रेल्वे डबे व इतर सामुग्री रायबरेली, जमालपूर,
मुझफ्फरपूर येथे
तयार होते.
*मालगाडीचे प्रकार बीओएक्सएनएचएल,
बीओबीवायएन, बीसीएन व बीसीएनएचएल असे
आहेत.
*परदेशांना जोडणाऱ्या रेल्वे सेवा-
पाकिस्तान- थर एक्सप्रेस, समझौता एक्सप्रेस,
बांगलादेश- मैत्री एक्सप्रेस
(ढा��कोलकाता)म्यानमार- मणिपूर-
म्यानमार
*रेल्वे सेवांचे प्रकार- दुरांतो एक्सप्रेस
या गाडय़ा राजधानी एक्सप्रेसपेक्षा वेगवान
असून त्यांना फार थांबे नसतात.
*राजधानी एक्सप्रेस- या वातानुकूलित
गाडय़ा नवी दिल्लीला जोडलेल्या आहेत. वेग
ताशी २०० किमी करण्याचा प्रस्ताव.
Thursday, June 22, 2017
राष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय/गमतीदार गणित व मुळाक्षरे
राष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय
अलाहाबाद बैंक - कोलकाता
बैंक ऑफ इंडिया - मुंबई
बैंक ऑफ महाराष्ट्र - पुणे
केनरा बैंक - बैंगलोर
सेंट्रल बैंक ऑफ इंडिया - मुंबई
कॉरपोरेशन बैंक - मंगलौर
देना बैंक - मुंबई
इंडियन बैंक - चेन्नई
इंडियन ओवरसीज बैंक - चेन्नई
ओरिएंटल बैंक ऑफ कॉमर्स - नवी दिल्ली
पंजाब नेशनल बैंक - नवी दिल्ली
पंजाब एंड सिंध बैंक -- नवी दिल्ली
सिंडिकेट बैंक - मणिपाल
यूको बैंक - कोलकाता
यूनियन बैंक ऑफ इंडिया - मुंबई
यूनाइटेड बैंक ऑफ इंडिया - कोलकाता
विजया बैंक - बैंगलोर
आंध्रा बैंक - हैदराबाद
बैंक ऑफ बड़ौदा - मुंबई
गमतीदार गणित व मुळाक्षरे
�� गणिती मनोरंजन ��
आपणांस हे माहित आहे का ?
��1 ते 99 पर्यंत स्पेलिंग मध्ये a, b, c, d वापर होत नाही.
��d चा वापर प्रथमच ‘Hundred’ मध्ये होतो.
��1 ते 999 पर्यंत स्पेलिंगमध्ये कुठेही a, b, c चा वापर होत नाही.
��a चा वापर प्रथमच ‘Thousand’ मध्ये होतो.
��1 ते 999,999,999 पर्यंत कुठेही b, c चा वापर होत नाही.
��b चा वापर प्रथमच ‘Billion’ मध्ये होतो.
��c चा वापर इंग्लिश काउंटिंगमध्ये कुठेही होत नाही.
��मनोरंजनातून गणिताची माहिती आपणांस आवडली असेल तर आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा...
तुम्ही आनंद घ्या.....
इतरांनाही आनंद द्या
Wednesday, June 21, 2017
महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे
● अकोला जिल्हा :
● अमरावती जिल्हा: ऊर्ध्व
वर्धा धरण
● अहमदनगर जिल्हा : आढळा प्रकल्प,ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण,
मांडओहळ धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव
(मुळा धरण, रुई छत्रपती धरण,
लोणीमावळा धरण, विसापूर तलाव,सीना धरण, हंगा धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण)
● औरंगाबाद जिल्हा : गराडा तळे,
गौताळा तलाव, जायकवाडी धरण,
नागद तलाव, निर्भोर तळे
● उस्मानाबाद जिल्हा : तेरणा धरण
● कोल्हापूर जिल्हा : रंकाळा तलाव
● गडचिरोली जिल्हा : दिना
● गोंदिया जिल्हा : इटियाडोह
● चंद्रपूर जिल्हा : पेंच आसोलामेंढा
● जळगाव जिल्हा : अग्नावती धरण,अंजनी धरण, अभोरा धरण,
काळा बंधारा, कृष्णपुरी बंधारा, गाळण पाझर तलाव, गिरणा धरण,जामदा बंधारा, तोंडापुरा धरण,दहीगाव बंधारा, धामणगाव बंधारा,पांझण उजवा कालवा, पिंपरी बंधारा,बहुळा धरण, बळाड बंधारा, बुधगाव बंधारा, बोरी धरण,भोकरबारी प्रकल्प, मंगरूळ धरण,मन्याड धरण, महरून तलाव, मोर धरण,
म्हसवा बंधारा, वडगाव बंधारा, वाघूर धरण, वाडी पाझर तलाव, सातगाव डोंगरी, सार्वेपिंप्री बंधारा,सुकी धरण, हतनूर धरण, हिवरा धरण, होळ बंधारा (एकूण ३२)
● जालना जिल्हा :
● ठाणे जिल्हा : भातसा धरण, बरवी,सूर्या धामणी, सूर्या कवडासे
● धुळे जिल्हा : अक्कलपाडा धरण,अंचोळे, कानोली, गोंदूर तलाव,डेडरगाव तलाव, देवभाने, नकाणे तलाव,पुरमेपाडा, मांडळ, राक्षी, हरणमाळ तलाव
● नंदुरबार जिल्हा : यशवंत तलाव,
● नागपूर जिल्हा : उमरी कान्होजी,कामठी खैरी , कोलार, निम्न वेणा (वाडेगाव), निम्न वेणा (नांद) ,पेंच तोतलाडोह , पेंच रामटेक ,पेंढारी धरण, मनोरी धरण,रोढोरी धरण, साईकी धरण.
● नांदेड जिल्हा : इसापूर धरण, निम्न दुधना धरण, विष्णुपुरी धरण
● नाशिक जिल्हा : अर्जुनसागर,
केल्झार धरण, गंगापूर धरण,
गिरणा धरण, चणकापूर धरण,,
लोहशिंग,गिरणा धरण, चणकापूर धरण,,
लोहशिंगवे धरण, हरणबारी धरण, पुणे गाव, कारजवन, तिसगाव, ओझरखेड,वाघाड, पालखेड, भावली धरण, मुकणे धरण, कडवा, दारणा धरण
● परभणी जिल्हा : कर्परा धरण, लोअर दुधना धरण, पूर्णा येलावारी,पूर्णा सिद्धेश्वर, येलदरी धरण
● पुणे जिल्हा : आंध्रा धरण, उरवडे बंधारा, खडकवासला धरण, घोड धरण,चपेट धरण, चासकमान धरण, चंचवड बंधारा, टेमघर धरण, डिंभे धरण,तुंगार्ली धरण, देवघर धरण,पवना प्रकल्प, पानशेत धरण,पिंपळगाव
धरण, पिंपोळी बंधारा, भाटघर धरण,भुशी धरण, भूगाव बंधारा, माणिकडोह धरण, मारणेव्बाडी बंधारा,मुळशी धरण, येडगाव धरण, रिहे बंधारा,लवळे बंधारा, लोणावळा तलाव, वडज धरण, वरसगाव धरण, वळवण धरण, वाळेण बंधारा, वीर धरण, शिरवटा धरण,आयएनएस शिवाजी तलाव, हाडशी बंधारा १, हाडशी बंधारा २ (एकूण ३४)
● बुलढाणा जिल्हा :
खडकपूर्णा धरणनळगंगा धरण वाण,पेंटाळी
● बीड जिल्हा : माजलगाव धरण,मांजरा धरण
● भंडारा जिल्हा : इंदिरासागर
प्रकलप, कऱ्हाडा तलाव प्रकलप, खांब तलाव प्रकलप, चांदपूर तलाव प्रकलप,बहुळा धरणप्रकलप, बालसमुद्र प्रकलप,इतीयाडोह प्रकलप , बाघ शिरपूर प्रकलप, बाघ पुजारीटोला प्रकलप,बाघ कालीसरार प्रकलप , गोसीखुर्द
प्रकलप
● मुंबई जिल्हा : मोडक सागर, तानसा,विहार, तुळशी
● यवतमाळ जिल्हा: पूस ,अरुणावती ,बेंबळा
● वर्धा जिल्हा : ऊर्ध्व वर्धा धरण,डोंगरगाव प्रकल्प, धाम धरण(महाकाली जलाशय), नांद प्रकल्प,निम्न वर्धा धरण, पंचधारा प्रकल्प,पोथरा प्रकल्प, बेंबळा प्रकल्प, बोर
प्रकल्प, मदन उन्न,ई प्रकल्प, लाल नाला प्रकल्प, वडगाव प्रकल्प,वर्धा कार नदी प्रकल्प, सुकळी लघु
प्रकल्प (एकूण १४)
● वाशीम जिल्हा :
● सातारा जिल्हा : उरमोडी धरण,
कण्हेर धरण, कास तलाव,कोयना धरण(शिवसागर), जांभळी जंगल तलाव,तापोळा तलाव, तारळी धरण, धोम धरण, बलकवडी धरण, बामणोली तलाव,मोती तलाव, मोरणा धरण, वेण्णा तलाव (एकूण १२)
● सिंधुदुर्ग जिल्हा : तिलारी देवधर धरण
● सोलापूर जिल्हा : आष्टी तलाव,उजनी धरण , एकरुख तलाव, कंबर तलाव,गिरणी तलाव,पाथरी तलाव, भीमा-सीना नद्यांना जोडणारा भूमिगत कालवा , बुद्धिहाळ तलाव,यशवंतसागर (उजनी) तलाव,संभाजी तलाव,सिद्धेश्वर तलाव, हिप्परगी तलाव,एकरुखे तलाव, होटगी तलाव (एकूण ११)
● हिंगोली जिल्हा : येलदरी धरण,
सिद्धेश्वर धरण.
प्राणी व त्यांचे आयुष्यमान
प्राणी व त्यांची आयुर्मर्यादा-
१. मलेशियन कासव - १५० ते १६० वर्षे
२. कासव - ८० वर्षे
३. हत्ती - ६० वर्षे
४. चिँपाझी - ५० ते ६० वर्षे
५. गरूड - ५५ वर्षे
६. घोडा - ५० वर्षे
७. गेँडा - ४१ वर्षे
८. पाणघोडा - ४० वर्षे
९. अस्वल - ३४ वर्षे
१०. झेब्रा - २२ वर्षे
११. माकड - २० वर्षे
१२. वाघ - २० वर्षे
१३. मांजर - २२ वर्षे
१४. कुञा - २० वर्षे
१५. चिमणी - ७ वर्षे
१६. गोल्डफिश - १० वर्षे
Tuesday, June 20, 2017
राष्ट्रगीताबद्दल माहिती
१) राष्ट्रगीत (National Anthem) : रविंद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत लिहिलेले ‘ जन-गण-मन ’ या गाण्याच्या हिंदी रुपांतरनाचे संविधान सभेने २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीत म्हणून स्विकार केला.
२) २७ डिसेंबर १९११ रोजी भारतीय कोंग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले.
३) राष्ट्रगीतामध्ये एकूण पाच कडवे असून हे गीत पूर्णपणे ५२ सेकंदामध्ये म्हणण्याची प्रथा आहे.
४) काही वेळेस हे गीत संक्षिप्त रुपात गायले जाते त्याचा कालावधी २० सेकंद आहे.
५) जन-गण-मन हे गीत पहिल्यांदा जानेवारी १९१२ मध्ये ‘ भारत विधाता ’ या शीर्षकाखाली ‘ तत्व बोधिनी ’ पत्रिकेमध्ये छापले गेले होते.
६) १९१९ मध्ये या गीताचे इंग्रजीमध्ये रुपांतरण करून ‘ Morning song of India ’ या नावाने छापले गेले.
७) राष्ट्रीय गीत (National Song ) : बंकिमचंद्र चटर्जी यांचे ‘ वंदे मातरम ’ हे संस्कृतमधील गीत स्वातंत्र्य लढ्यातील लोकांसाठी प्रेरणेचे स्त्रोत होते.
८) राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यांना समान दर्जा आहे.
९) १८९६ च्या भारतीय कोंग्रेसच्या अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले होते.
१०) बंकिमचंद्र चटर्जी यांच्या १८८२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘ आनंदमठ ’ या कादंबरीतून घेतले असून याचे इंग्रजीमध्ये भाषांतर श्री. अरबिंदो यांनी केले आहे.
विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात ?
हवामनाचा अभ्यास------------------------------- मीटिअरॉलॉजी
रोग व आजार यांचा अभ्यास--------------------- पॅथॉलॉजी
ध्वनींचा अभ्यास---------------------------------- अॅकॉस्टिक्स
ग्रह-तार्यांचा अभ्यास----------------------------- अॅस्ट्रॉनॉमी
वनस्पती जीवनांचा अभ्यास---------------------- बॉटनी
मानवी वर्तनाचा अभ्यास-------------------------- सायकॉलॉजी
प्राणी जीवांचा अभ्यास--------------------------- झूलॉजी
पृथ्वीच्या पृष्ठ भागावरील पदार्थांचा अभ्यास----- जिऑलॉजी
कीटकजीवनाचा अभ्यास------------------------ एन्टॉमॉलॉजी
धातूंचा अभ्यास----------------------------------- मेटलर्जी
भूगर्भातील पदार्थांचा (खनिज वगैरे) अभ्यास---- मिनरॉलॉजी
जिवाणूंचा अभ्यास------------------------------- बॅकेटेरिओलॉजी
विषाणूंचा अभ्यास------------------------------- व्हायरॉलॉजी
हवाई उड्डाणाचे शास्त्र--------------------------- एअरॉनाटिक्स
पक्षी जीवनाचा अभ्यास---------------------------ऑर्निथॉलॉजी
सरपटनार्या प्राण्यांचे शास्त्र---------------------- हर्पेटलॉलॉजी
आनुवांशिकतेचा अभ्यास----------------------- जेनेटिक्स
मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास--------------------- न्यूरॉलॉजी
विषासंबंधीचा
अभ्यास--------------------------- टॉक्सिकॉलॉजी
ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र--- कार्डिऑलॉजी
अवकाश प्रवासशास्त्र-------------------------- अॅस्ट्रॉनॉटिक्स
प्राणी शरीर शास्त्र ----------------------------- अॅनाटॉमी
मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास)----- अँथ्रापॉलॉजी
जीव-रसायनशास्त्र------------------------------ बायोकेमिस्ट्री
सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र)-------- बायोलॉजी
रंगविज्ञानाचे शास्त्र----------------------------- क्रोमॅटिक्स
विविध मानववंशासंबंधीचा अभ्यास------------ एथ्नॉलॉजी
उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र- हॉर्टिकल्चर
शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र---------------------- फिजिअॉलॉजी
फलोत्पादनशास्त्र------------------------------ पॉमॉलॉजी
मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र------ - टॅक्सीडर्मी
भूपृष्ठांचा अभ्यास------------------------------- टॉपोग्रा
Monday, June 19, 2017
महाराष्ट्रातील महामंडळे
महाराष्ट्रातील महामंडळे
=========================
१) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - दिनांक १ ऑगस्ट, १९६२
२) महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ - ३१ मार्च, १९६६
३) महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ - दिनांक १ एप्रिल, १९६२
४) महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ - १९६२
५) महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन - १९७८
६) महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ - १९६२
७) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - १९७५
८) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ -१९६१
९) महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ (मर्यादित) - १९६३
१०) महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ - १९६५
११) मराठवाडा विकास महामंडळ - १९६७
१२) कोकण विकास महामंडळ (मर्यादित) - १९७०
१३) विदर्भ विकास महामंडळ (मर्यादित) - १९७०
१४) महाराष्ट्र कृष्ण खोरे महामंडळ - १९९६
१५) विदर्भ सिंचन विकास महामंडळ - १९९७
१६) कोकण सिंचन विकास महामंडळ - १९९७
१७) तापी सिंचन विकास महामंडळ - १९९७
१८) गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ - १९९८
१९) महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ - १९७८
२०) म्हाडा - १९७६
स्टार्ट अप इंडिया
देशातील सर्व नागरिकांना २०२२ पर्यंत हक्काचे घर आणि वीजपुरवठ्यासारख्या मूलभूत सुविधा.
- युवा उद्योजकांच्या प्रोत्साहनासाठी ‘स्टार्ट अप इंडिया’ आणि देशाच्या भविष्यासाठी ‘स्टॅंड अप इंडिया’.
- खाणकामगारांसाठी विशेष योजना, प्रत्येक वर्षी सहा हजार कोटींची तरतूद.
- वीज नसलेल्या १८ हजार ५०० गावांत एक हजार दिवसांत वीजपुरवठा.
- शेती मंत्रालयाचे नाव आता कृषी आणि किसान कल्याण मंत्रालय.
- देशातील एक लाख २५ हजार बॅंक शाखांतून किमान एक दलित, एक आदिवासी आणि एका महिला उद्योजकाला ‘स्टार्ट अप’साठी कर्ज.
- नागरिकांसाठी कायद्यांचे सुलभीकरण; सध्याच्या ४४ कामगारविषयक कायद्यांचे चार कायद्यांत एकत्रीकरण.
- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेला आरंभ; ५० हजार कोटी रुपयांची तरतूद.
- माजी सैनिकांसाठी ‘वन रॅंक वन पेन्शन’ तत्त्वत: मान्य; संबंधितांशी चर्चा
- प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत १७ कोटी बॅंक खाती उघडून गरिबांच्या सक्षमीकरणाला चालना.
- स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान लाभार्थींच्या बॅंक खात्यात थेट हस्तांतरित करण्यामुळे १५ हजार कोटींची बचत.
- देशातील सर्व शाळांत स्वच्छतागृहांची सुविधा देण्याच्या वचनाची जवळपास पूर्तता; राज्यांकडून चांगले सहकार्य.
- भ्रष्टाचारमुक्त सरकारचे स्वप्न साकार, १५ महिन्यांत एक पैशाचाही भ्रष्टाचार नाही; काळा पैसा भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरू.
- एनडीए सरकार येण्यापूर्वी सीबीआयकडून तपास सुरू असलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे ८००; आता १८०० प्रकरणी तपास सुरू.
- जेथे पिण्याचे पाणी मिळणे कठीण होते; तिथे गॅस पाईपलाईनची सुविधा.
- विकासात दलित, पीडित, शोषितांना महत्त्वाचे स्थान
- शेतकऱ्यांच्या कल्याणाशिवाय कृषी विकास अपूर्ण; शेतकऱ्यांसाठी विशेष योजना राबवणार.
- मुलाखतीशिवाय केवळ गुणवत्तेनुसार नोकरी देण्याची गरज. त्यासाठी सरकार प्रयत्नशील.
- काही अपवादात्मक पदे वगळून छोट्या-मोठ्या नोकऱ्यांसाठी मुलाखती रद्द करणार.
कोण आहेत रामनाथ कोविंद
राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून रामनाथ कोविंद यांचे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपकडून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी दलित चेहऱ्याला संधी दिली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. रामनाथ कोविंद यांच्या निवडीमुळे ही चर्चा खरी ठरली आहे. सध्या रामनाथ कोविंद बिहारचे राज्यपाल म्हणून काम पाहात आहेत.
भाजपचा दलित चेहरा अशी रामनाथ कोविंद यांची ओळख आहे. भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांची नावे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी चर्चेत होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी उमेदवाराबद्दलचा सस्पेन्स कायम ठेवला होता. रामनाथ कोविंद मूळचे उत्तरप्रदेशच्या कानपूरचे आहेत. कानपूरमधील पराऊंख गावात १ ऑक्टोबर १९४५ रोजी रामनाथ कोविंद यांचा जन्म झाला. रामनाथ कोविंद कोळी जातीचे असून उत्तर प्रदेशात या जातीचा समावेश अनुसूचित जातीमध्ये केला जातो. पेशाने वकील असलेल्या कोविंद यांनी दिल्ली उच्च न्यायालयात काम केले आहे. रामनाथ कोविंद १९७७ ते १९७९ या कालावधीत दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारचे वकील म्हणून कार्यरत होते. रामनाथ कोविंद यांनी १९९१ साली भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर तीनच वर्षांनी म्हणजेच १९९४ मध्ये कोविंद यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली. रामनाथ कोविंद भाजपकडून दोन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. १९९४ ते २००० आणि २००० ते २००६ हा कोविंद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ होता.पक्षाचा दलित चेहरा असलेले रामनाथ कोविंद पक्षाचे प्रवक्तेदेखील राहिले आहेत. ८ ऑगस्ट २०१५ रोजी कोविंद यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपच्या दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी रामनाथ कोविंद यांनी सांभाळली आहे. यासोबतच अखिल भारतीय कोळी समाजाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.
रामनाथ गोविंद यांच्याविषयी 10 खास गोष्टी :
1. सध्या बिहारचे राज्यपाल
2. भाजपमध्ये दलित समाजचं प्रतिनिधित्व करणारं मोठं नाव
3. दोन वेळेस राज्यसभेचे खासदार
4. उत्तरप्रदेशच्या कानपूरचे रहिवाशी
5. भाजपच्या दलित मोर्च्याचे अध्यक्षही होते.
6. ऑल इंडिया कोली समाजाचे अध्यक्ष होते.
7. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ताही होते.
8. पेशानं वकिल
9. 2002 मध्ये संयुक्त राष्ट्रात भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.
10. गृह मंत्रालयासह अनेक मंत्रालयाचे सदस्य होते.
Sunday, June 18, 2017
GST म्हणजे काय?
उत्तर:- (पूर्ण वाचा)
वस्तू आणि सेवा म्हणजे काय ?
जनरली ज्या गोष्टी भौतिकरीत्या तुम्ही बघू शकता आणि विकत घेऊ शकता त्या गोष्टी वस्तू(Goods) मध्ये मोडतात. जसे कि कपडे, परफ्युम, शर्ट ई.
तसेच ज्या गोष्टींचा तुम्ही उपभोग घेता परंतु कायमच्या खरेदी करत नाहीत त्या सेवा(Services) मध्ये मोडतात. जसे कि हॉटेल, पर्यटन, वाहतूक, ई.
सरकार कर का घेते ?
वस्तू किंवा सेवा यातली कुठलीही गोष्ट जेव्हा तुम्ही खरेदी करता किंवा वापरता तेव्हा त्याचा कर सरकारला द्यावा लागतो. कर रूपाने वसूल झालेला पैसा सरकारच्या तिजोरीत जातो. सरकार हा पैसा विविध योजनांमध्ये वापरते. जसे कि रस्ते, रोजगार हमी योजना, धरणे, ई.
वस्तू आणि सेवा कर कायदा हा भारत सरकारचा सर्वात क्रांतिकारी निर्णय समजला जाणार आहे. या करालाच जी.एस.टी (GST) Goods and Services Tax म्हणूनही ओळखले जाते.
जुलै १, २०१७ पासून हा कायदा अमलात आणला जाणार आहे.
GST साठी भारतीय संविधानात दुरुस्ती देखील होणार आहे. हा कायदा VAT(Value Added Tax) ला रिप्लेस करणार आहे.
काय आहे वस्तू आणि सेवा कर कायदा ?
बऱ्याचदा बातम्या किंवा न्यूजपेपर मध्ये खूपच अर्थशास्त्राच्या संबंधित शब्द वापरल्याने GST हा कायदा समजण्यास खूप अवघड जाते. आपण एक उदाहरण घेऊनच हा कायदा समजून घेऊ.
या उदाहरणात आपण एक शर्ट चे उत्पादन ते विक्री बघू आणि तो सध्याच्या करपद्धतीने महाग कसा पडतो आणि नवीन करपद्धतीने( GST कायदा लागू झाल्यानंतर) कसा स्वस्त पडेल हे बघू.
M

GST मुळे सर्वात जास्त फायदा ग्राहकाला होणार आहे. तो कसा हे आपण पाहू.
उदाहरणासाठी टॅक्स रेट १०% आहे असे समजू.
कर आकारणीची सध्याची पद्धत:
१. शर्ट बनवणारी कंपनी शर्ट साठी लागणारे कच्चे मटेरिअल(कापड, दोरे, बटन ई.) ९० रुपयाला विकत घेते. हे विकत घेताना त्याला १०% टॅक्स द्यावा लागणार. म्हणजे मटेरियल सुमारे १०० रु चे झाले.
२. जेव्हा शर्ट तयार होतो तेव्हा ३० रु मजुरी लावून शर्ट ची किंमत १३० झाली. म्हणजे होलसेलर जेव्हा हा शर्ट कंपनीकडून विकत घेणार तेव्हा या १३० रु वर त्याला परत १०% टॅक्स द्यावा लागणार. म्हणजे १३ रुपये. म्हणजे शर्ट ची किंमत १३० + १३ = १४३ झाली. म्हणजे होलसेलर ला कंपनी शर्ट १४३ रु ला विकणार.
३. होलसेलर कडे हा शर्ट गेल्यानंतर तो नफ्यासाठी शर्टची किंमत २० रु ने वाढवतो. म्हणजे शर्ट ची किंमत झाली १४३+२० = १६३ रु.
४. जेव्हा होलसेलर रिटेलर ला हा शर्ट विकणार तेव्हा १६३ रु वर परत १०% टॅक्स(१६.३० रु) रिटेलर ला द्यावा लागणार. म्हणजे रिटेलर हा शर्ट १६३ + १६.३० = १७९.३० रुपायाला विकत घेणार.
५. रिटेलर जेव्हा ग्राहकाला हा शर्ट विकायला काढणार तेव्हा स्वतःचा नफा त्यात ऍड करणार. त्यात नफा म्हणून तो १० रु टाकणार. म्हणजे शर्टची किंमत १७९.३० + १० = १८९.३० इतकी होणार. यावर १०% टॅक्स(१८.९३ रु.) लागून ग्राहकाला हा शर्ट १८९.३० + १८.९३ = २०८.२३ रुपयाला खरेदी करावा लागेल.
म्हणजे सध्याच्या पद्धतीमध्ये वस्तूच्या प्रत्येक व्यवहारात टॅक्स लागला जातो आणि जास्त टॅक्स जमा केला जातो.
वरच्या उदाहरणात कच्च्या मटेरिअल पासून तर ग्राहकापर्यंत पोहचेपर्यंत शर्ट च्या किंमतीत १० + १३ + १६.३० + १८.९३ = ५८.२३ रु. टॅक्स ऍड झाला आहे.
GST नंतर(१ जुलै २०१७ नंतर) कर कसा आकारला जाईल:
१. शर्ट बनवणारी कंपनी शर्ट साठी लागणारे कच्चे मटेरिअल(कापड, दोरे, बटन ई.) ९० रुपयाला विकत घेते. हे विकत घेताना त्याला १०% टॅक्स द्यावा लागणार. म्हणजे मटेरियल सुमारे १०० रु चे झाले.
२. मग कंपनी या शर्टची किंमत १३० रु ठरवणार. यावर १०% टॅक्स म्हणजे १३ रु लागणार. पण कंपनीने आधीच कच्च्या मटेरिअलवर १०% टॅक्स दिल्याने येथे कंपनीला फक्त ३० रु वरच टॅक्स भरावा लागणार, म्हणजेच ३ रु. कंपनी हा शर्ट होलसेलर ला १३३ रु ला विकणार.
३. होलसेलर स्वतःचा नफा टाकून शर्ट १५० रु ला लावणार. यावर १०% टॅक्स लावताना आधीचा टॅक्स कमी करून फक्त नफ्याच्या रकमेवरच टॅक्स लावला जाईल. म्हणजे २ रु.
४. म्हणजे रिटेलर ला हा शर्ट १५२ रु ला मिळणार. मग रिटेलर आपला नफा टाकून शर्त १६० रु ला लावणार. ग्राहकाला विकताना त्याला फक्त नफ्यावरच टॅक्स भरावा लागेल म्हणजे १ रु.
५. आणि ग्राहक हा शर्ट १६१ रु ला विकत घेईल.
म्हणजेच कच्च्या मटेरिअल पासून तर ग्राहकापर्यंत पोहचेपर्यंत शर्ट च्या किंमतीत १० + ३ + २ + १ = १६ रु. टॅक्स ऍड झाला.
म्हणजे सध्याच्या पद्धतीत २०८.२३ रु ला मिळणारा शर्ट GST अमलात आणल्यानंतर फक्त १६१ मिळेल. म्हणजे ग्राहकाचे सुमारे ४५ ते ५० रुपये यात वाचतील.
उदाहरणातील आकडे थोडे मागे पुढे होऊ शकतात पण GST कायद्याने ग्राहकाचे पैसे कसे वाचतात हे नक्कीच समजण्यास मदत होईल.
एकंदरीत GST मुळे कच्चे मटेरीअल ते ग्राहकापर्यंत वस्तू पोहचवण्यासाठी जी टॅक्स ची चैन होते ती तुटली जाणार आहे आणि त्यातून थेट फायदा ग्राहकाला होणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकार दोघेही हा कर वसूल करणार:
भारत एक संघराज्य आहे. म्हणजे देशातील राज्यांचा कारभार हा स्वायत्त चालतो. म्हणून राज्य आणि केंद्र सरकारकडून वेगवेगळा GST वसूल केला जाईल. सध्यादेखील केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळा कर आकारत आहेत. फरक फक्त उदाहरणात सांगितल्याप्रमाणे टॅक्स ची चैनिंग बंद होणार आहे. सध्या जगातील जवळपास सर्वच प्रगत देशात अशाप्रकारची करआकारणी होते त्यामुळे भारतात हा कायदा अमलात आणताना काही अडचण येऊ नये असे मला वाटते.
FORWARDED...
Subscribe to:
Posts (Atom)
♦️ चालू घडामोडी - ३१ ऑक्टोबर २०१७
#UPSC_MPSC_2018 ▪️ [WBCSD- वर्ल्ड बिजनेस कौन्सिल फॉर सस्टेनेबल डेव्हलोपमेंट सिंगापूरस्थित ओलम इंटरनॅशनलचे सहसंस्थपाक सनी वर्गीस यांना म...

-
पंचायत राज स्विकारणारी राज्ये अनुक्रमे कशी लक्षात ठेवावी??? *ट्रीक-* राजने अंधा असताना नाटकात उडी घेउन पंजाब व उत्तर महाराष्ट्रा...
-
99 वी घटनादुरूस्ती : ही सर्वात अलिकडील संमत झालेल्या घटनादुरूस्तींपैकी महत्वाची घटनादुरुस्ती आहे. (100 वी घटनादुरुस्ती ही भारत आणि बांगल...
-
१) सुभाषचंद्र बोस -- नेताजी २) रविंद्रनाथ टागोर -- गुरुदेव ३) पंडित जवाहरलाल नेहरू -- चाचा ४) मोहनदास करमचंद गांधी -- राष्ट्रपिता ५)...